या प्रसंगी समर्थांनी स्वतः केलेली पद्यरचना लोकप्रसिद्ध आहे.

आम्हि काय कुणाचे खातो

तो राम अम्हाला देतो ॥ध्रु०॥

बांधिले घुमट किल्ल्याचे तट

तयाला फुटती पिपळवट

तेथे कोण लावितो मोट

बुडाला पाणी घालितो ॥१॥

खडक फोडिता सजिव रोडकी

पाहिली सर्वांनी बेडकी

सिंधू नसता तियेचे मुखी

पाणी कोण घालितो ॥२॥

नसता पाण्याचे बुडबुडे

सदासर्वदा गगन कोरडे

दास म्हणे जीवन चहूंकडे

पाहुनी सडे पीक उगवितो ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel