मागे दिलेले तेराव्या पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते अब्दपुरीत श्राद्ध . अब्दपूरीत म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध ! जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही अब्दपूरीतासाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूरीत व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतू किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरूजी बोलावून करावे असे वाटते . 


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel