बेचैन होऊन चित्तोडला गेल्यावर अल्लाउद्दिन खिलजीला चित्तोडचा किल्ला भारी संरक्षणात अस्सालेला दिसला. ती प्रसिद्ध सुंदरी राणी पद्मावती हिची एक झलक पाहण्यासाठी खिलजी वेडा झालेला होता आणि त्याने राजा रतन सिंहला असा संदेश पाठवला की तो राणी पद्मिनीला आपल्या बहिणी समान मानतो आणि तिला भेटू इच्छितो. सुलतानाचा संदेश मिळताच राजा रतन सिंहने त्याच्या रोषापासून वाचण्यासाठी आणि आपले राज्य वाचवण्यासाठी त्याहे ऐकले. राणी पद्मिनी अल्लाउद्दिन खिलजीला काचेत आपला चेहेरा दाखवण्यास तयार झाली. जेव्हा अल्लाउद्दिनला हे समजले की राणी पद्मिनी त्याला भेटायला तयार झाली आहे, त्याने आपले निवडक योद्धे घेऊन सावधानतेने किल्ल्यात प्रवेश केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel