सर्व महिलांचा कौल जोहार कडेच होता. एक विशाल चिता पेटवण्यात आली आणि राणी पद्मिनीच्या पाठोपाठ चित्तोडच्या सर्व स्त्रियांनी त्यात उडी घेतली. आपल्या स्त्रियांच्या मृत्युनंतर चित्तोडच्या पुरुषांकडे जगण्यासाठी काहीही उरले नव्हते. चित्तोडच्या सर्व पुरुषांनी व्रत घेतले ज्यामध्ये प्रत्येक सैनिकाने केशरी वस्त्र आणि पगडी परिधान करून शत्रू सैन्याशी तोपर्यंत लढले जोपर्यंत ते सर्व मारले गेले नाहीत. विजयो सेनेने जेव्हा किल्ल्यात प्रवेश केला, तेव्हा त्यांचा सामना राख आणि जळलेल्या हाडांशी झाला. ज्या महिलांनी जोहार केला त्यांच्या आठवणी आज देखील लोकसंगीतामधून जिवंत आहेत आणि ज्यामध्ये त्यांच्या गौरवास्पद कार्याचे वर्णन केले जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel