कल्याणजी आणि आनंदजी दोन भावांची जोडी होती ज्यांनी १९५४ पासून ते २००० पर्यंत चित्रपट जगतात संगीत दिले. १९७५ मध्ये त्यांना आपला चित्रपट 'कोरा कागज' साठी सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला. १९६१ मधील 'छलिया' हा त्यांचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. त्यांच्या लोकप्रियते मागचे आणखी एक कारण म्हणजे ते समाजातील सर्व वर्गाला मदत करण्यासाठी कार्यरत राहत असत. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे चित्रपट व्यवसायाला अनेक नवे गायक आणि गायिका प्रदान केल्या. त्यांची गाणी नेहमीच अतिशय लोकप्रिय होत होती आणि दीर्घ काळ 'बिनाका गीतमाला' वर राज्य करीत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel