आह्मीं जावें कवण्या ठायां ।
न बोलसी पंढरीराया ॥१॥

सरिता गेलीं सिंधूपाशीं ।
जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥

जळ कोपलें जळचरासी ।
माता न घे बालकासी ॥३॥

जनी ह्मणें आलें शरण ।
जरी त्वां धरिलेंसे मौन्‍य ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel