आईच्या आठवणीतंच सकाळ उजाडली.. सर्व आटोपून मी निघण्याची तय्यारी करू लागले.. जास्त लवाजमा सोबत नव्हता घेतला.. दोन जोडी कपडे आणि काही आवश्यक वस्तूच घेतल्या होत्या बॅगेत.. सकाळी अकराच्या आसपास एसटी कुर्ला आगारातून सुटली, ती पंधारवाडीला जाण्यासाठी.. प्रवास साधारण सहा ते सात तासांचा होता.. पण, अर्ध्या वाटेत एसटी बंद पडल्यामुळे पंधारवाडीला पोहचायला खुपंच ऊशीर झाला.. संध्याकाळी सहाला पोहोचणारी एसटी तेव्हा रात्री साडेअकराला पोहोचली होती.. एसटीमध्ये प्रवासीदेखील जेमतेमंच उरले होते.. पंधारवाडी स्टँड आलं आणि मी एसटीमधून उतरले.. त्याकाळी गावात वीज नव्हती.. पण, तरीही त्या स्टँडवर एक विजेचा टिमटिमता दिवा होता.. बाकी एसटी स्टँड वाटावं असं तिथं काहीच नव्हतं.. साधं बसायला एक बाकडाही नव्हता.. मी हातातली बॅग जमिनीवर ठेवणारंच होते की, तेवढ्यात एसटीने माझ्यापासून चाळीस-पंन्नास मीटर अंतरावर जावून करकचून ब्रेक मारला.. एसटी जागच्या जागी थांबली.. धाडकन एसटीच्या पत्र्याचा दरवाजा उघडला आणि आतून चार प्रवासी खांद्यावर अडकवलेल्या भरभक्कम बॅगांसकट खाली उतरले.. त्यांना सोडून ती एसटी निघून गेली.. ही माणसं मुंबईपासूनंच माझे सहप्रवासी होते ह्या एसटीमध्ये.. एसटी जेव्हा वाटेत बंद पडली होती तेव्हा हे चारंही जण इतर प्रवाश्यांशी टवाळकी करत होते.. त्यांच्या वागण्यावरून ते सराईत गुन्हेगारंच वाटत होते.. त्यामुळे हे इथे असे अचानक उतरल्यामुळे सहाजिकंच माझ्या छातीत भितीने धडधडायला लागलं होतं.. माझ्याकडे नजर रोखून ते चौघेही गंभीर चालीने येवू लागले.. त्यांच्या मनात काहीतरी वाईट खदखदतंय ह्याचा अंदाजा मला त्यांच्या हावभावाने एव्हाना आला होता.. ते माझ्या दिशेने सरसावू लागले.. त्या प्रत्येकांच्याच चेह-यावर त्यावेळी एक कावेबाज हास्य खुललं होतं.. पुढचं ओळखून मी स्वतःला सावरत क्षणाचाही विलंब नं लावता तिथून पळ काढला.. ते चौघेही माझा पाठलाग करू लागले.. मी जास्त लांब नाही जावू शकले आणि थोड्याच अंतरावर त्यांनी मला गाठलं.. मी भितीने थरथर कापत होते अन ते नराधम एखाद्या क्रूर राक्षसाप्रमाणे हसत होते.. त्यातल्या एकाने त्याची खांद्यावरची बॅग काढून खाली काढून ठेवली अन पुढे होत माझे कपडे फाडायला लागला.. तश्या बाकीच्यांनीही बॅगा धडाधड जमिनीवर फेकून दिल्या आणि मला ओरबाडायला सुरूवात केली.. तसा त्यांचा हात जोरात झटकून मी कशीबशी तिथून निसटली..!!

ह्या अनपेक्षित घडलेल्या प्रसंगाने मी पूर्णपणे हादरून गेली होती.. भिती तर नसानसांत ऐवढी भिनली गेली होती की, थोड्याच वेळात भोवळ येवून मी तिथेच धाडकन कोसळले.. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा जाणवलं की, माझ्या अंगावर जवळ-जवळ जेमतेमंच कपडे शिल्लक होते.. त्या नराधमांनी त्यांचा डाव साधला होता.. माझ्या अंगात जराही त्राण उरला नव्हता.. डोळेसुद्धा जड झाले होते.. तेव्हा त्या चौघांचाही कुजबूजण्याचा आवाज माझ्या कानात घुमायला लागला.. ते मला मारून टाकायचा बेत आखत होते.. त्यांना हे प्रकरण पोलिसांपर्यंत जावू द्यायचं नव्हतं.. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी होती नव्हती तेवढी सगळी ताकद एकटवून उठून धावत सुटले.. ह्या नराधमांच्या तावडीत जर परत सापडले तर काय होईल ह्या नुसत्या विचारानेच माझ्या मनाचा थरकाप उडाला आणि मग माझ्या पळण्याचा वेगही आपोआपंच वाढला.. शेवटी धावून-धावून मी दमले.. मागे वळून पाहिलं तर ते चौघेही कुठेच दिसत नव्हते.. त्यामुळे थोडी उसंत खावी म्हणून मी थांबले.. लागलेल्या धापांना आवर घालत सहजंच बाजूला नजर टाकली तेव्हा लक्ष्यात आलं की, मी फिरून पुन्हा त्याच एसटी स्टँडवर आले होते..!! तो स्टँड बघून आता डोकं पार चक्रावून गेलं अन मग मी तिथेच हंबरडा फोडून रडू लागले.. त्यावेळेस माझं भानही हरवलं.. अश्यावेळी काय करावं काहीच सुचत नव्हतं.. शरीरानेही साथ द्यायचं टाळलं होतं.. तेव्हा अचानकंच ते चौघेही माझ्या पुढ्यात येवून उभे राहिले, मी तर आता हार मानली होती.. प्रतिकार करण्यासाठी अंगात जराही ताकद उरली नव्हती.. तेव्हा हात जोडत, जीवाची भिक मागत घायाल झालेला माझा जीर्ण देहं तिथेच जमिनीवर पडला.. मग तडक त्यातल्या एकाने माझी केसं पकडून तसंच फरफटंत स्टँडच्या कडेला नेलं.. फरफटल्यामुळे जमिनीवर विखुरलेल्या छोट छोट्या दगडी खड्यांनी माझं शरीर रक्तंबंबाळ झालं होतं.. त्याच अवस्थेत केसं मुठीत गच्चं धरूनंच त्याने मला उठवलं.. मी पडत धडपडत कशीबशी उठले.. पण, तेवढ्यात माझ्या पुढ्यात उभा असलेल्या दुस-या नराधमाने कसलाही विचार नं करता पोटात धारधार सुरा भोसकला.. त्या सु-याच्या घावाने माझं शरीर कळवलं अन एक जोरदार किंकाळी फोडून जमिनीवर तडफडत पडलं.. आता डोळ्यांपुढे ते चौघेही गरागरा फिरायला लागले होते.. माझी शुद्ध हरपली.. पण, तरीही आसपासचा आवाज घंटानादाप्रमाणे कानात घुमायला लागला होता.. माझ्या डोळ्यांची झापड अर्धवट उघडी होती.. त्यामुळे जे काय चालू होतं ते अस्पष्ट का होईना पण दिसत होतं.. अचानकंच बोलता- बोलता सावित्री शांत झाली.. अन क्षणार्धातंच घरात स्मशान शांतता पसरली.. सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले.. कोणाला काहीच समजत नव्हतं.. तेव्हा मग हळूच तिच्या ईवळण्याचा आवाज घराची शांतता चिरत सर्वांच्या कानावर येवून दणकन आपटला.. तिने तिचं जळालेलं ओठ विस्कटून विद्रुप चेह-यावर उमटवलेलं भयाण हास्य अंगाचा थरकाप उडवत होता.. समीरकडे नजर रोखतंच सावित्री दुडक्या चालीने त्याच्याजवळ आली.. तिच्या डोळ्यांत आता रक्ताचे थेंब अश्रूंच्या स्वरूपात जमू लागले होते.. तिच्या तोंडातून निघणारी गरम वाफ त्याच्या तोंडावर जावून आदळत होती.. जळालेल्या चमडीचा वासही अजून उग्र होऊन घरभर पसरत होता.. डोळ्यांची बुब्बुळं भराभर फिरवत तिने आवंढा गिळून चिडलेल्या अन कर्कश आवाजात बोलू लागली- जिवंतपणीच मला नरकयातना देण्यासाठी त्यातल्या एका नराधमाने जास्त वेळ नं दडवता खिशातून लाईटर काढलं अन माझ्या कपड्याच्या टोकाशी धरलं.. त्या फाटलेल्या तुकड्यासोबतंच माझ्या जीर्ण आणि रक्ताळलेल्या शरीरानेही पेट घेतला.. मी खुपच हतबल झाले होते.. माझ्या शरीरात ओरडण्याइतपतंही अवसान शिल्लक राहिलं नव्हतं.. मुक्यापणे जळत रहाण्याखेरीज मला काहीच करता येत नव्हतं.. मी अगतिक झाले होते..

थोड्या वेळातंच आगीचे चटके गार पडू लागले.. मरणाची वाट बघत असलेल्या माझ्या सोशीक शरीरात अजूनंही जीव बाकी होता.. अर्धवट जळालेल्या माझ्या शरीरामधून मांस जळाल्याचा उग्र वास आणि निघणारा धूर स्टँडभोवती पसरत होता.. पण, त्या निर्दयी लोकांना माझी जराही कीव येत नव्हती.. तश्या अवस्थेतंच त्यांनी मला जवळंच खोदून ठेवलेल्या खड्डयात पुरून टाकलं.. बघता बघता काही क्षणातंच राहिलेल्या सर्व स्वप्नांचा झालेला चुराडा, मागे ठेवून मी माझा प्राण सोडला.. त्यांच्या हसण्याचा क्रूर आवाज हा मी ऐकलेला शेवटचा आवाज ठरला..!!

स्टँडजवळंच टाकलेल्या बॅगा पटापट उचलत ते आता काय करायचं ह्याचा विचार करू लागले.. आता रात्र खुप झाली होती.. त्यामुळे सकाळशिवाय कोणतंही वहान त्यांना मिळणं शक्य नव्हतं... त्याकाळी प्रवासाचं प्रमुख साधन बैलगाडी आणि एसटीच होती.. बैलगाडी ह्यावेळेस भेटणं शक्य नव्हतं अन एसटीची फेरीदेखील दिवसभरातून दोनदाच होती.. पहिली फेरी दुपारी तीनची आणि दुसरी फेरी संध्याकाळी सहाची.. आता पहाटेचे चार वाजत आले होते. थोड्याच वेळात सुर्योदय होणार होता... त्यामुळे स्टँडवर ताटकळत बसण्यापेक्षा त्यांना गावात जाणंच जास्त सोयीचं वाटलं.. जसं जमेल तसं चालत ते गावाच्या वेशीजवळ आले.. वेशीपासून गाव साधारण तीन-चार किलोमीटर लांब होतं.. ईथपर्यंत पोहोचायलाच त्यांना दोन तास लागला होता.. तोवर सुर्यदेखील उगवला होता.. त्यामुळे आजूबाजूचा परिसर आता प्रकाशामध्ये व्यवस्थीतपणे दिसायला लागला.. गावक-यांची आपापल्या शेतावर जाण्यासाठी लगबगही चालू झाली होती.. सारं वातावरण प्रसन्न वाटत होतं.. तेव्हा तिथूनंच बैलगाडी हाकत जाणा-या ग्यानबा नामक गावक-याला ते चौघेही मदतीसाठी अडवतात.. काही तासांपुरती गावामध्ये राहण्याची सोय करायला सांगून त्याबदल्यात त्याला जास्तीचे पैसेही देवू करतात.. पैश्यांच्या हव्यासापोटी त्याने त्या चौघांनाही त्याच्याच एका वापरात नसलेल्या खोपट्यामध्ये नेलं.. तिथेच त्यांना जेवणाचीही सोय करून दिली.. दारू तर त्या चौघांनीही सोबतंच आणली होती.. त्यामुळे त्यांच्या मनासारखं छान जमून आलं होतं.. सर्व आटोपून ते खोपट्याच्या बाहेरंच अंथरून ठेवलेल्या फाटक्या गोणपाटांवर येवून बसले.. आसपास एक फिरती नजर टाकून ते सर्व दारूच्या मैफीलीला सुरूवात करतात.. हे गाव त्यांच्या डोळ्यांना भावलं होतं.. गावाची हिरवळ डोळ्यांत साठवत ते दारूचे घोट रिचवत होते.. ग्यानबाने सर्व व्यवस्था चांगली करून दिली होती.. दारूचा प्याला घश्याखाली उतरवंत ते मैफीलीचा आनंद घेत होते.. आता सुर्यसुद्धा डोक्यावर आला होता.. दारूची धुंदीही त्या चौघांवर चांगलीच चढली होती.. त्यात रात्रभर झोपंही मिळाली नव्हती.. म्हणून नशेतंच ग्यानबाला हाक देवून ते सर्व आवरायला सांगतात.. पण, हाकेला ओ देण्यासाठी तो तिथे नव्हताच.. तो तर केव्हाचाच शेतातल्या कामासाठी निघून गेला होता.. दारूच्या धुंदीत त्यांना ते आठवत नव्हतं.. त्यामुळे एकसारखं ग्यानबाच्या नावाचा जाप त्यांनी सुरू ठेवला होता.. ऐवढा वेळ आवाज देवूनंही तो येत नाही हे पाहून त्यातला एक ग्यानबाच्या नावाने शिव्या हासडणारंच होता की, तेवढ्यात तिथे एक विशीतली तरूणी पायातल्या पैंजणांचा आवाज करत तिथे आली.. तिचं रूप त्या ऊन्हात लखलखंत होतं.. नववारीमध्ये झाकलेलं तिचं अंगं डोक्यावरच्या पदराने आणखीनंच शोभून दिसत होतं.. अश्या ह्या अप्सरेला पाहून त्या चौघांचीही वाईट नजर तिच्या सर्वांगावर रेंगाळते.. हापापलेल्या नजरेने ते तिला न्याहाळू लागतात.. ती मात्र तशीच लाजत, डोक्यावरचा पदर सावरत तिथेच उभी असते.. तेव्हा त्या चौघांपैकी एक स्वतःला सावरत तिला काही बोलाणारंच होता की, ते आधीच ओळखून तिच बोलते- " म्या इंदू.. ग्यानबा धायगुड्यांची ल्योक.. बा ने मला तुम्हासणी काय हव नगं ते संमदं बगायला धाडलंया.." तिच्या ह्या असल्या मादक आवाजाने त्यांना जागच्या जागीच पार घायाळ करून टाकलं होतं.. कोणालाच कशाची शुध्दं नव्हती.. मग ती तशीच पैंजणांचा आवाज करत मटकत त्यांच्या पुढ्यात येवून, रिकाम्या झालेल्या दारूच्या बाटल्या आणि खरकटी भांडी आवरून तिथून आली तशीच निघूनंही जाते.. त्या चौघांच्या डोळ्यांत आता मात्रं तिचीच नशा चढलेली असते.. तिच्या त्या मादक आठवणीतंच ते धुंद होवून तिथेच गोणपाटावर अंगं टाकून झोपी जातात.. रात्री जागरण झाल्यामुळे पडल्या जागी त्यांना गाढ झोप लागते..!!

सायंकाळचे साडेचार वाजत आले होते.. तेव्हा कसल्याश्या तरी आवाजाने त्यातल्या एकाला जाग आली.. डोळे चोळतंच तो आजूबाजूला नजर फिरवतो.. त्यासरशी छमम छमम पैंजणांचा आवाज करत इंदू त्याच्या पुढ्यात येवून उभी रहाते, तशी ह्याच्या ओठांची पाकळी खुलते.. " पावणं, आता दिस मावळाया लागलाय.. तवा तुम्हासणी स्टँडपतुरचा परवास तासाभरात पुरा करायचा आसल तर, आसं गावाला हेलपाटा मारून नका जावु.. म्या सांगतेया त्या वाटेनी जावा, लगीच तासाभरात स्टँडवर पोहचाल.." तिच्या ह्या मादक आवाजातलं बोलणं ऐकून तो हुळरून जातो.. तसाच जाग्यावर उभा राहून तो नुसतं तिला न्याह्याळाला लागतो.. त्याचं न्याह्याळणं चालूच असतं पण ती पटकन जावून अगोदरंच सोय करून ठेवलेली बैलगाडी खोपट्याजवळ घेवून येते.. बैलांच्या घुंगरांच्या आवाजाने इतर तिघांनाही जाग येते.. तेव्हा त्यांचा पहिला मित्र राजेश त्यांच्याकडे वळत बोलतो, "बघा मित्रांनो, इंदूने आपल्याला स्टँडवर जाण्यासाठी ह्या बैलगाडीची सोय केली आहे.." राजेशच्या बोलण्याने तिघेही चकीत होतात.. कारण, त्यांना बैलगाडी तर दिसत होती पण इंदू कुठेच दिसत नव्हती..!!

"काय झालं रे..? असे का बघताय.?" मित्रांना गोंधलेलं पाहून राजेश विचारतो..

" बैलगाडी तर दिसतेय पण, इंदू कुठेय.?" सागर आश्चर्याने विचारतो..

"अरेरे, हि काय इंदू बैलगाडीजवळंच तर उभी आहे " असं बोलत राजेश मागे नजर वळतो.. त्यासरशी त्याला एक जोरदार धक्का बसतो.. कारण, तिथे नुसती बैलगाडीच उभी होती.. इंदू तर आसपास कुठेच दिसत नव्हती..!! काही सेकंदापुर्वीच तर ती इथे होती मग आता ऐवढ्या लगेच अशी कशी काय गायब झाली..? राजेश स्वतःच्याच मनाला विचारू लागतो.. शेवटी स्वतःचीच समजूत काढत, गेली असेल घरी असं मनाला पटवून देत तो ह्या विषयाला बगल देतो.. आता पाच वाजत आले होते.. त्यामुळे पटापट आवरून ते गाडीत येवून बसायला लागतात.. तेव्हा "अरेरे.. पण, बैलगाडी हाकणारा कुठेय.? इंदूने तर नुसती बैलगाडीच दिली आहे. गाडीवान कुठेय.? " त्यातला तिसरा नराधम वसंत खिजगणीतून सुटलेल्या समेस्येकडे सर्वांचं लक्ष्य वेधतो.. " गाडीवान हवाय व्हय.? मग म्या कोण हाय.?" एक भारदस्त आवाज अचानक त्यांच्या कानावर दनकन येवून आदळतो..!!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel