दोघांत आजला

अफाट अन्तर

जुळून पाकळ्या

उडाल्या नंतर-

जीवनावाचून

जळला अंकुर

प्रश्नहि राहिला

राहिले उत्तर !

 

संग्रामी आजला

शोधतो जीवित

उरींचे ओघळ

दाबून उरात-

उठती भोवती

धुळीचे पर्वत

अखण्ड फिरते

वरून कर्वत !

वादळी रणांत

करणे कोठून

नाजूक भावांचे

लालनपालन-

तरीही केधवा

पडता पथारी

थडगी दुभंग

होतात अंतरी-

आठवे तुझ्या ते

प्रीतीचे मोहळ

आणि हो बिछाना

आगीचा ओहळ !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel