एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत राहिला.

त्याला पाहून कोल्ह्याला एक युक्ती सुचली आणि तो ढोंगीपणाने म्हणाला-

'मित्रा, पहा बरं, मी कसा संकटात सापडलो आहे ते ! आणि हे सगळं तुझ्याचमुळे झालं. मी पहाटे तुझा आवाज ऐकला आणि म्हणून तुझी काय हालहवाल ते विचारण्यासाठी मी इथे आलो आणि या सापळ्यात अडकलो. तर तू मला एक काठी आणून दे म्हणजे मी माझी सुटका करून घेईन.'

हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि त्याने शेतकर्‍याला कोल्हा पिंजर्‍यात अडकला आहे असे सांगितले. तेव्हा शेतकरी मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या कोल्ह्याला खरपूस मार दिला. त्या माराने कोल्हा मरण पावला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to इसापनीती चरित्र आणि कथा १-५०


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गावांतल्या गजाली
सापळा
अजरामर कथा
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
भारताची महान'राज'रत्ने
रत्नमहाल
शिवाजी सावंत