सुनंदा राजेश सोबत राहायला मुंबईत आपल्या बाळासह आली. राकेशने बाळाचे नाव "अक्षर" ठेवले.

दरम्यान अभिजित श्रीवास्तवसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन अमितजींनी राजेशला जो एक गुप्त प्लान सांगितला होता त्याची वेळ येऊन ठेपली होती.

अमित श्रीवास्तव यांचा "मालामाल हो जाओ" या कार्यक्रमाचा नुकताच दहावा सिझन सुरू झालेला होता आणि त्याच्या शुक्रवारच्या खास एपिसोड मध्ये अमितजिंनी सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राजेशला निवडले होते. सिने क्षेत्रातील लेखकांसाठी त्याला काहीतरी कामगिरी करायची आहे हा विचार अमितजींना आवडला. आणि नेहमीप्रमाणे डायरेक्ट दहा हजाराच्या प्रश्नापासून सुरुवात केली गेली.

विशेष म्हणजे अमितजींच्या खास विनंतीवरून हा शो लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि शोचे सर्वेसर्वा "कमलेन्द्र बोस" यांनी अमिताभच्या विनंतीला मान दिला होता.

गेम शो सुरु होण्याआधी -

"राजेश जी, आम्हाला सांगा, तुम्ही येथून एक करोड जिंकलात तर त्या पैशांचे काय करणार आहात?"

"या सिनेसृष्टीत मी अनेक वर्षांपासून फ्री लान्स फिल्म जर्नालिस्ट आणि एक लेखक आणि समीक्षक म्हणून कार्यरत आहे. येथून मी जी काही रक्कम जिंकेन त्यातील काही रक्कम मी या क्षेत्रातील लेखक आणि पत्रकार यांचेसाठी एक संस्था उघडून त्यांना आर्थिक मदत तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वापरेन!"

"धन्यवाद राजेश जी बहोत उमदा विचार ही आपके! तो चलीये खेलते है - मालामाल हो जाओ!"

खेळ सुरु होतो -

"तो राजेश जी, अगला प्रश्न दस हजार रुपये के लिये ये रहा आपके कंप्युटर स्क्रीन के ऊपर!"

इनमेसे कौन "कौन है वह" फिल्म मे भूत नही बना है?

1. राकेश कुमार

2. पवन ममतानी

3. फारुख पटेल

4. अनिता राठी

"सर D अनिता राठी"

"बिलकुल सही जवाब आपका! अगला प्रश्न बिस हजार रुपये के लिये ये रहा!

आपको एक गाना सुनाई देगा आपको बताना है ये किस अभिनेत्री पर चित्रित किया गया है?

"राजाजी का बजा दूंगी मै बाजा, तो फिर नाच नाच, नाच नाच, नाच रे मन मोहना!"

1. शिवानी संध्या

2. मनमित कौर

3. साबरिना सोनाटा

4. मधुमालीनी मेहता

सर "मनमित कौर" पर ठप्पा लगा दो.

मुबारक हो! आप बिस हजार जित गये.

चालीस हजार रुपये के लिये अगला प्रश्न ये रहा!

1983 का वर्ल्ड कप भारत ने जीता तब कप्तान कौन थे?

1. सुनील गावस्कर

2. कपिल देव

3. रवी शास्त्री

4. राणा दुग्गुबाती

सर "कपिल देव" पर ठप्पा लगा दो.

बिलकुल सही जबाब आपका!

अस्सी हजार लिये प्रश्न ये रहा

कौनसे फिल्म मे फिल्म के हिरो राजेंद्र शास्त्री मोबाईल के टॉवर पर चढ जाते है?

1. आग के गोले

2. भोले दोस्त

3. जाली दुश्मन

4. कालिया का बदला

सर "आग के गोले" पर सिक्का मार दो.

अस्सी हजार जित गये आप.

एक लाख साठ हजार के लिये प्रश्न ये रहा.

इनमेसे कौनसी फिल्म पाच साल थिएटर मे चली?

1. भले आदमी दुल्हन चुरा लेंगे

2. ‎हमारी दुल्हनियाँ की मेहंदी

3. मेहंदी वाले हाथो में कंगना खनक खनक जाए

4. चुडियो का चाँद

सर ऑप्शन मेहंदी वाले हाथो पर ठप्पा लगा दो .

आ बिलकुल सही जवाब!

एक लाख साठ हजार जित गये आप.

पुढे आणखी प्रश्न विचारले गेले. तोपर्यंत फक्त एकच चौथी लाईफलाईन उरली होती.

कॉल युवर बडी!

आणि शेवटी एक करोडचा प्रश्न आला.

"किस्मत का खेल" इस फिल्म की कथा किसने लिखी?

1. के. के. सुमन

2. पि. के. सुमन

3. ‎आनंद कुमार

4. ‎संतोष ठाकूर

राजेश मुद्दाम विचारात पडला. त्याला उत्तर माहित नाही असे तो चेहऱ्यावर दाखवू लागला.

"राजेश जी, आप लेखक है और आपको इसका उत्तर मालूम होना चाहिये!"

तरीही राजेश विचारात गढलेला दिसत होता.

"कोई बात नही. अगर उत्तर मालूम नही हो तो अभी भी आपके पास एक लाईफलाईन बची है! कॉल युवर बडी!"

"ठीक है सर! मै लाईफलाईन युज करना चाहूँगा!"

"किसे कॉल लगायेंगे आप?"

"सर मेरा दोस्त! माझे चांगले मित्र आहेत जे आता फिल्म इंडस्ट्री मध्येच कार्यरत आहेत - सारंग सोमैय्या! त्यांना मी कॉल करू इच्छितो!"

"कंप्युटर भैय्या, सारंग जी को फोन लगाया जाय!"

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

"सारंग सहाब नमस्ते, मैं अमित श्रीवास्तव बोल रहा हूं, मालामाल गेम शो से!"

"सर, नमस्कार कैसे है आप?"

"मैं बढिया हुं, आप बताईए क्या हालचाल है आपके?"

"बस सर! आपके राज मे सब कुछ ठीक चल रहां हैं!"

"अरे अरे ऐसां मत काहिये. मेरे सामने बैठे है राजेश. वे पचास लाख जित गये है और उन्हे जरुरत हैं आपकी मदद की एक करोड के सवाल के जवाब के लिये. वें अब प्रश्न पढेंगे!"

काउन्ट डाऊन सुरू झाले.

राजेश सारंगशी बोलू लागला, "सारंग, किस्मत का खेल या हिंदी चित्रपटाची कथा कुणी लिहिली, मी ऑप्शन वाचतो..!"

राजेशला मध्येच तोडत सारंग म्हणाला, "राजेश अरे, ऑप्शन वाचायची काय गरज आहे? या चित्रपटाची कथा तूच तर लिहिली आहेस राजेश!"

एव्हाना हा कार्यक्रम बघणाऱ्या कुणीतरी पिके आणि केकेला फोन करून टिव्ही लावायला सांगितले आणि मालामाल कार्यक्रम बघायला सांगितले. आतापर्यंत त्या कार्यक्रमात काय काय झाले हे सांगितले.

पिके आणि केकेला आता काहीतरी मोठा घोळ होणार आणि आपण अडकणार आणि आपले बिंग फुटणार याची चाहूल लागली...

"क्या बात कर रहे हो आप सारंग भाई? कृपया राजेश को चार ऑप्शन में से सही जवाब बताईये, समय बीता जा रहा है."

"सर, अब मैं क्या बताऊ आपको, सच हकीकत तो राजेश ही बतायेगा आपको, राजेश जिस पेन से आप कागज पे लिखते हो उस पेन की कसम और जिस कीबोर्ड से आप कंप्युटर पर टाईप करते हो उस कीबोर्ड की कसम, आपको सच बोलना पडेगा!"

राजेश ने विचार केला आणि सूचक नजरेने अमितजी कडे पाहिले आणि शेवटी बोलायला लागला, "हो, अमितजी! किस्मत का खेल या चित्रपटाची कथा ज्यात तुम्ही काम केले होते आणि तो चित्रपट खूप हीट झाला होता, त्याची कथा मी एका दिवाळी अंकात म्हणजे दिवाळीच्या काळात छापले जाणारे मराठी मॅगझिन यात लिहिली असून ती केके सुमनने चोरली आणि स्वतः च्या नावावर खपवली! इसलिये इस सवाल के चार ऑप्शन गलत हैं अमितजी! सही जवाब हैं राजेश, खुद मैं!"

"आप केके जैसे महान हस्ती पर गलत इलजाम लगा रहे हैं राजेश, क्या सबूत हैं आपके पास?"

"सर, अगर आप आज्ञा दे तो मेरे पास एक व्हिडिओ हैं! मोबाईल में. आप कृपया इस बडे परदे पर दिखाईये."

"ये गेम शो एक अजीब मोड पर आकर रुका हैं. मैं इस गेम शो के मालिक "कमलेन्द्र बोस" से मिलकर पाच मिनट मे आता हूं, तब तक आप हॉट सीट पर बैठे रहे!"

दरम्यान या शोने अतिशय वेगळे वळण घेतल्याने भारतात सगळीकडे अनेक लोकांनी एकमेकांना नातेवाईकांना मित्रांना फोन करून करून टीव्हीवर तो प्रोग्राम लावायला सांगितले.

कमलेंद्रने अमितजींना अर्थातच व्हिडिओ दाखवण्याची परवानगी दिली कारण हे आधीच ठरलेले होते. हे राजेशलाही माहीत होते. प्रेक्षकांना मात्र हा रियालिटी शो रियल वाटावा म्हणून थोडेसे रियल नाटक केले गेले. राजेशने त्या रात्री रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ प्ले केला आणि केकेचे सगळे बिंग फुटले.

केके ला अस्वस्थ वाटू लागले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पिकेने कोर्टात मानहानीचा दावा दाखल करायचे मनोमन ठरवले पण वीणा वाटवेने त्याला रोखले.

मग त्या कार्यक्रमात अनेक प्रेक्षकांचे फोन आले. प्रेक्षकांनी राजेशची सहानुभतीपूर्वक चौकशी केली. अनेक प्रश्न विचारले. अनेक लेखकांचे फोन आले. त्यांनी राजेशला या धाडसी कृत्याबद्दल धन्यवाद दिले. अनेक दिवाळी अंकांच्या लेखकांनी, संपादकांनी कार्यक्रमात फोन केले आणि राजेशचे आभार मानले. केकेच्या कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या काही जणींनी सुध्दा कार्यक्रमात फोन केला. त्या आजही बॉलीवूड मध्ये काही ना काही दुय्यम भूमिका करत होत्या.

राजेशच्या टीम मधील एकाने एकंदर परिस्थिती पाहता ठरल्याप्रमाणे कोर्टात राजेश तर्फे केकें विरुद्ध केस दाखल केली. केके ला हॉस्पिटल मधून बरे वाटल्यावर पोलिस अटक करणार होते. जवळपास आता केके वर आरोप निश्चिती झाली होती. कोर्टात रितसर आरोप निश्चित होऊन जवळपास के के ला अटक होण्यासारखी परिस्थिती निश्चित होती.

कोर्टात केकेच्या वकिलाने असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, राजेशने धोका देऊन केकेच्या असिस्टंटला व्हिडिओ समोर धमकावून खोटे खोटे आणि बळे बळेच केकेला त्याने न केलेला गुन्हा कबूल करायला लावला पण एकंदर कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या अनेक जणींनी आणि शेवटी मतपरिवर्तन झालेल्या पिकेने केकेच्या विरोधात साक्ष दिल्याने तसेच रत्नाकर रोमदाडेने प्रतीपक्षाच्या वकिलाने केलेल्या प्रश्नांवर पत्करलेली शरणागती आणि त्याची उडालेली भंबेरी आणि शेवटी त्याने कबूल केलेला गुन्हा यामुळे आरोप निश्चिती झाली.

कोर्टाने दोन गुन्ह्यांखली केकेला एकूण दोन शिक्षा सुनावल्या: चार वर्षांचा तुरुंगवास आणि नुकसान भरपाई म्हणून राजेशला पन्नास लाख रुपये देण्याचा आदेश दिला. मालामाल हो जाओ कार्यक्रमात मिळालेले एक कोटी रुपये राजेशने ठरल्याप्रमाणे संस्थेसाठी वापरण्याचे ठरवले आणि पन्नास लाख रुपये त्याला कोर्टाकडून भरपाई म्हणून मिळाले.

yyyy

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel