एका बागेत एक मधमाश्यांचे पोळे होते. त्यातला मध खाण्यासाठी एक अस्वल तेथे गेले. त्याने त्या पोळ्याला तोंड लावले व आता मध पिणार, तोच सगळ्या मधमाशा त्याच्यावर तुटून पडल्या व त्याच्या नाकातोंडावर चावून त्याला अगदी सतावून सोडले. त्यामुळे ते अस्वल इतके वेडावल्यासारखे झाले की रागाच्या भरात त्याने स्वतःच्या डोक्याची कातडी स्वतःच्या पंजाने फाडून टाकली.

तात्पर्य

- प्राणिमात्राच्या संतापाचा अतिरेक झाला की त्या भरात तो स्वतःलाही इजा करून घेण्यास कमी करत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel