''.... देवानें शेवटी माझी अशी निराशा केली ! हाय ! स्वर्गलोकाला सोडून मी येथें कशाला बरें आलों ? जिकडे तिकडे अगदीं अंधार - अंधार आहे येथें ! भूलोक समजून मी चुकून नरकांत तर नाहीं ना आलों ? अरे मला घोडाघोडा खेळायला कोणी एक तरी सूर्यकिरण द्या रे ! तीन दिवस झाले, पण मला प्यायला, एकसुद्धां स्वच्छ व गोड असा वायूचा थेंब अजून मिळाला नाहीं ! देवा ! तूंच नाहीं का मला सांगितलेंस कीं, या मृत्युलोकांत आनंद आहे म्हणून ? मग कोठें आहे रे तो आनंद ? हाय ? नऊ महिने सारखा अंधारांत धडपडत, ठेंचा खात, वारंवार नरड्याला वेलीनीं घट्ट बसविलेले कांटेरी फांस सोडवीत खोल अशा घाणेरडया चिखलाच्या डबक्यांतून रडत रडत, मोठ्या आशेनें मीं प्रवास केला, पण शेवटी काय ? - नको ! अरे काळोखा ! असे कडकडा दांत खाऊन जिकडे तिकडे अशी तेलकट घाण पसरुं नकोस ! - माझ्या जिवाला आग लागली ! मला तडफडून मारुं नका रे ! - आ ! माझ्या तोंडावरचा हा धुराचा बोळा काढा ! नाहीं ! मी पुनः येथें येणार नाहीं ! अरेरे ! माझ्या आशेचा उंच डोलारा शेवटीं या काळोखांत विरुन गेला ना ! काय ? येथें मोठमोठ्यानें रडायला सुरवात झाली ? चला ! आधीं आपल्या स्वर्गाला परत चला ! .... ''

२ नोव्हेंबर १९११

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel