सर्व काळ ज्याचें अंतर कुटिळ । त्यानें गळां माळ घालूं नये ॥१॥

सर्व भूती जया नाहीं क्षमा शांति । त्यानें अंगीं विभुती लावूं नये ॥२॥

तुका म्हणे जया न घडे भगवद्भक्ति । तेणें भगवें हातीं धरुं नये ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel