जन तें आंधळे भुलले पैं वांया । विठ्ठल सखया वांचोनियां ॥१॥

भुललीं बापडी पायीं तिणें बेडी । कोण तोडातोंडी करील त्यांची ॥२॥

यमाची यातना होईल बा जेव्हां । सोडाविल तेंव्हा कोण त्यासी ॥३॥

याचलागी म्हणा रामकृष्णा हरी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel