टिळकांची ही कामगिरी चालू असता येथील सुशिक्षित लोकांत व इंग्लंडात गोखल्यांनी चळवळ केली. हिंदुस्तानास हक्क द्या, लोक अधीर आहेत, असे त्यांनी सांगितले. गोखल्यांनी आपल्या पाठीमागे काम करणा-यांस मार्ग दाखवून ठेवला आहे. टिळकांचा संस्थांवर विश्वास नव्हता. परंतु हे खरे की कर्तबगार लोकांच्या धुरीणत्वाखाली संस्था नीट चालविल्या, वंशपरंपरा- रामदासी गादीप्रमाणे- केल्या नाहीत तर त्या कार्यक्षम होतात. निरनिराळ्या संस्था पुढा-यांस पाठिंबा देतात. गोखल्यांनी ही व्यवस्था भारतसेवक समाज काढून केली आहे. त्यांनी दिशा दाखविली आहे.  नि:स्वार्थतेचा धडा स्वत: सोडवून दाखविला आहे. व्ही. कृष्णशास्त्री आयंगार यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'Great ideas create peoples, enlarge the horizen of the peoples, liberate their conscience from the materialism by which it is weighed down, set a vast mission before them and rebaptise them.'  गोखल्यांनी कार्य केले. स्वत:च्या लोकोत्तर उदाहरणाने 'आधी केले मग सांगितले' याप्रमाणे ते वागले. त्यांच्या कामाची मुख्य दिशा आता लोकशिक्षण ही होती. ते कौन्सिल सोडून आता लोकशिक्षणाकडे सर्व आयुष्य खर्च करणार होते. लाला लजपतराय यांनी देशात काय केले पाहिजे, लोकांस काय पाहिजे, पुढा-याने कशावर प्रयत्नांची झोड उठविली पाहिजे हे सांगताना लिहिले आहे :- 'The position thus analysed resolves itself into an educational problem. View it from whatever point you choose, religious, moral, intellectual, social or industrial, the question of Indian progress is a question of education. This is, so to say, the question of questions upon the right solution of which hang the destinies of the nation, viz; how to educate the people so as to befit them for the performance of those duties, a proper discharge of which alone can secure for them their right position in the commonwealth. The car is a heavy one and those who care to join in carrying it must be men of strong convictions, indomitable will, irresistible energy and untiring perseverance; they must be men of action and men of honour. ' असे लोक तयार होण्यासाठी गोखल्यांनी भारत- सेवक समाज काढला. देशातील सुशिक्षणसंपन्न लोकांपैकी शेकडा दहा तरी लोक निदान शेकडा एक तरी लोक या आपल्या कामास मिळावे, अशी त्यांची इच्छा असे. मॉडर्न रिव्ह्यू म्हणतो :- 'It was his desire that educated Indians should levy a contribution upon themselves not in money but in men for doing the work of the country.' अशा प्रकारच्या तरुणांनी आता पुढे यावे. त्यागाशिवाय भोग नाही हा सृष्टीचा कठोर नियम आहे. त्यागाने पवित्र झालेले मिळविण्यत आनंद आहे. आयते आपल्या पदरात कोणी घालणार नाही. जगात असे उदाहरणच नाही. आणि आयते मिळाले तरी त्यात लज्जा नाही; स्वारस्य नाही; मान नाही. काळोखातून धडपडत जाऊन जो प्रकाश आपणास मिळतो त्यावेळचे सौख्य, तो आनंद काही और आहे. परंतु काळोखातून उजेडात जाण्यासाठी उठले पहिजे. आपली दरी सोडून बाहेर निघाले पाहिजे. खोलीचे दरवाजे बंद करून बसलो तर अंधार नाहीसा होणार नाही. टिळक व गोखले यांनी आपआपल्या परीने शक्य तितके देशकार्य केले. आता जबाबदारी आपणांवर आली आहे.

परिस्थितीप्रमाणे मार्ग आखले पाहिजेत. आज एकंदर जगात फारच प्रचंड, अतर्क्य अशा घडामोडी झाल्या आहेत. लढाईमुळे तर एकंदर जगात फारच क्रांती घडून येत आहे. जुने मार्ग लोपत चालले आहेत. लढाई, अत्याचार यांनी यापुढे कार्य न होता, एकोप्योने राष्ट्रसंघापुढे आपआपली गा-हाणी मांडून प्रश्न सोडवावे लागतील. टिळकांससुध्दा अत्याचार मान्य नसत हे 'सरला राणी चौधरी' यांनी आपल्या टिळकांच्या आठवणीत दिले आहे. परंतु सर्वराष्ट्रीय बंड पुकारले तर ते त्यास पसंत होते एवढेच नव्हे तर ते त्याचे सेनापती झाले असते. '' असे इल्बर्ट बिलाच्या वेळेस १८८५ मध्ये लंडन टाइम्सने लिहिले होते ते सत्य आहे. इंग्रज सरकारची वृत्ती यामुळे आपल्याकडे कशा प्रकारची राहील हे उघड दिसते, परंतु आपण भावी परिणामावर दृष्टी ठेवून वागू या. उशीर लागला तरी चालेल; परंतु शाश्वत मर्गाने चला असे गांधी वगैरे महात्मे आता सांगू लागले आहेत. अर्थात परिस्थिती, काळ कदाचित हे सर्व अनुकरणीय, व्यवहार्य ठरवील. परंतु तत्त्वाचा मोठेपणा त्यामुळे नाहीसा होत नाही. तथापि जे तरवारीने मिळविले ते तरवारीने राखावे लागते, या तत्त्वाच्या योगाने जगात कायमची शांतता नांदणे अशक्य होईल. दिवसेंदिवस लोकमतास मान मिळत चालला आहे. सरदार, दरकदार, भांडवलवाले मोठमोठे कारखानदार जे पैसे पुरवून सरकारास इभ्रतीसाठी, भांडवलासाठी, व्यापाराच्या संरक्षणासाठी लढाईस उद्युक्त करतात आणि नाहक इतर साधारण लोकांचे प्राण घेतात, अशा लोकांस राष्ट्रात दिवसेंदिवस कमी वर्चस्व मिळत जाणार. तेव्हा लढायांनी हक्क मिळविण्याचे मार्ग दिवसेंदिवस कमी होत जाणार. लॉईड जॉर्ज म्हणतात, ''There are times in history when this world spins so leisurely along its destined course that it seems for centuries at a standstill.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel