Abhay:
प्रकरण ११
पाणिनी ने आपली गाडी हम रस्त्याला वळवली. “ कुठे चाललोय आपण?”  जयकर ने विचारले.
“ अत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी चाललोय.पोलीस तुला शोधताहेत , बहुतेक मलाही शोधात असावेत.म्हणून मी विचार केला की तुला बरोबर घ्यावं आणि पोलिसांनी अनन्याला शोधण्यापूर्वी आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करावा. आता मुख्य अडचण अशी आहे की आपण हे प्रकरण हाताळण्याचा काही मार्ग जोवर शोधत नाही तो पर्यंत पोलीसाना  तुझ्या पर्यंत कसे पोचू द्यायचे नाही.”
“ काय पद्धत आपण वापरायची?’’
“ मला हे उत्तर माहीत असतं तर अशा प्रकारे आपण गाडीतून भटकत बसलो नसतो. एक गोष्ट तुला सांगू शकतो,जर अनन्यादोषी असेल तर तिला वस्तुस्थितीला समोर जावेच लागेल.”
“ ती नाहीये.मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो, ती नाही दोषी.” 
“ तुला काय माहिती?”
“ कारण मी तिला चांगलं ओळखतो.”
“ कारण तुझा तिच्यावर विश्वास आहे, आणि विश्वास असायचं कारण तुझं प्रेम आहे.”
तुम्हाला ही तसच वाटत नाही?”
“ अत्ता तरी नाही.मी काही तिच्या प्रेमात पडलेलो नाही. बर आहे तर मग, आपण काय रात्रभर  अस गाडीतून फिरत बसू शकत नाही.पोलीस मला शोधत असतील तर  तर ते शोधून काढतीलच.मला,  त्यांना हे काही सांगायच नाहीये.मी माझा वकील देऊ शकतो, मला माहित्ये की देता येतो.”
पाणिनी पाणिनी पटवर्धन चे यावरील मौन बरेच काही सांगणारे होते.
“ माझं प्रतिनिधित्व करायला मी वकील नाही देऊ शकत? तो मला सल्ला नाही का देणार की  मी गोवला जावू शकतो या सबबीवर कशाचेही उत्तर देऊ नको?”
पाणिनी ने मानेने नकार दिला.” त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळेल.”
सौम्या ने पाणिनी कडे मुद्दाम बघून त्याचे लक्ष वेधून घेतले.” कनक ओजस ला काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल असे तुम्हाला वाटतंय का?” सौम्या ने विचारले.
“ बरोबर आहे मुद्दा तुझा सौम्या.” पाणिनी ने मान्य केले.
त्या माणसाचा काहीतरी ठाव ठिकाणा....”
 पाणिनी ने मान डोलावली नंतर  जयकर कडे वळून  म्हणाला,” इकडे बघ निमिष, मला मोकळे पणाने सांग, अनन्याला कसलातरी त्रास होता हे तुला माहीत होत? कशाचा त्रास होता?”
“ हो माहीत होत, पण अत्ता, तेव्हा नव्हत.मिरगल ची आमच्या लग्नाला परवानगी नव्हती.त्यने तिला दूर निघून जायला सांगितलं होत.का ते मला माहीत नाही पण मेलेल्या बद्दल वाईट बोलू ने पण जेव्हा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तेव्हा माझं रक्त उसळतं.”
“ अनन्यातुझ्या साठी अनुरूप नाही अशी त्याची कल्पना होती का?”
“ बहुतेक उलट असेल. मी काही देखणं देवदूत नाही, सर्व साधारण आहे.मिरगल स्वतःचे असे एकांतात आयुष्य जगला. त्याचेकडे भावनेला थारा नव्हता. तो एक असं थेरडा ...”
 जयकर ने स्वतःला पुढे शिवीगाळ करण्या पासून रोखले.” तिने तुला कधीही सांगितले नाही की मिरगल तिच्यावर नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे दबाव आणत असे?”
“ त्याची तिच्यावर अमर्याद हुकुमत होती. मी त्याच्याशी आदराने वागायचा प्रयत्न केला.तो  कौटुंबिक मित्र होता.अर्थात तो वयाने मोठा होता.”
“ बर, आपण आता जरा मिलिंद बुद्धीसागर बुद्धीसागर बद्दल बोलू.”
“तुम्हाला त्याच्या बायको बद्दल बोलू अस म्हणायच आहे का?”
“ नाही त्याच्या बद्दलच. नवरा.”
“ त्याच्या बद्दल काय?”
“अनन्याला त्याच्या बद्दल काय वाटायचे?”
“ दुसऱ्या कोणाबद्दल सुद्धा वाटायचे नाही एवढे मैत्रीपूर्ण संबंध होते. तो नेहेमीच समंजस पणे वागायचा “ दोघांत काही वैयक्तिक आकर्षण?”
 ”छे,छे, अजिबात नाही.”
“ नक्की?”
“अर्थात, खात्रीच आहे मला. मिलिंद बुद्धीसागर ने लीना शी म्हणजे मृणालिनी शी लग्न केलं आणि मी....म्हणजे अनन्या आणि माझ्यातील प्रेम .....म्हणजे आम्ही लग्न करणार आहोत.”
“ तिच्यात आणि मिलिंद बुद्धीसागर मधे समान धागा असा काही नाही?”
“ काहीही नाही”
पाणिनी ने आपली गाडी मुख्य रस्त्यावरून एका दुसऱ्या रस्त्यावर घेतली. “ कुठे जातोय आपण ?”  जयकर ने घाबरून विचारले. “ मी फोन करणारे एक.एका गुप्त हेराला मी कामाला लावलय आणि या प्रकरणात त्याला काय काय समजलंय ते मला बघायचयं. मी फोन करे पर्यंत अनन्याकुठे असू शकेल त्या प्रत्येक शक्यतेचा विचार करून ठेव. तिला किमान फोन वरून कुठे संपर्क करता येईल हे कदाचित  तुला  आठवेल.”
“ समजा आज मी घरीच गेलो नाही तर? ते वाईट दिसेल का?”
“ खूपच वाईट दिसेल.पोलिसांना संशय येईल असे काहीही करू नकोस.पण  त्यांना सामोरे जाण्या पूर्वी तुझ्या हातात दोन तास आहेत, किंवा तीन तास.काहीतरी संशोधनाच्या कामात होतो असे त्यांना सांगू शकतोस तू.”
“ समजा मी सिनेमा बघत होतो अस सांगितलं तर?”
“ ते त्याच्या बद्दल सर्व विचारतील.”
“ मी करू शकतो ते.जो सिनेमा मी आधीच बघितलाय तोच मी सांगीन.”
“ तो मोठया थिएटर मधे असला पाहिजे,जिथे तुला कोणी ओळखणारे भेटणार नाही. तिकीट घे आत जा,तिकीट जपून ठेव,थोड्या वेळाने बाहेर पड. माझा फोन झाला की मी तुला थिएटर मधे सोडतो. “
पाणिनीला  फोन बूथ दिसला. गाडी लावायला जागा मिळण्यासाठी कोपऱ्या वरून वळावे लागले. 
“ तुम्ही दो

घे थांबा इथेच,” पाणिनी ने ओजस ला फोन लावला.” काय नवीन? अनन्याचा पत्ता लागला का?”
“ तिचा नाही पण मिलिंद बुद्धीसागर चा लागला.”
“ आणि ती त्याच्या बरोबर आहे ?”
“ बिलकुल नाही. त्याला शोधण्यासाठी तो ज्या ज्या क्लब चा सभासद होता त्यासर्वांना फोन लावले. आणि निरोप ठेवला की महत्वाचे काम आहे, तो आला तर मला फोन करायला सांगा म्हणून., थोड्या वेळाने मला वाईल्ड कॅट नावाच्या क्लब मधून त्याचा फोन आला.तो म्हणाला की मी अत्ताच क्लबात आलो आणि निरोप मिळाला.मी त्याला सांगितलं की  मला फारच तातडीने म्हणजे अगदी लगेचच  अनन्याला भेटायचे आहे. त्यावर त्याचा प्रतिसाद एकदम थंड होता.तो म्हणाला ,ती जिथे राहत्ये त्या घरी फोन आहे, मिरगल च्या नावाने तो डिरेक्टरीत सापडेल तिथे फोन करा. मी त्याला म्हणालो की तो प्रयत्न करून झालाय माझा पण दुर्दैवाने संपर्क होत नाहीये. मी त्याला हे ही म्हंटल की ती संध्याकाळी तुमच्या बरोबर होती अस कळलं. त्यावर तो म्हणाला की तुम्हाला चुकीची माहिती मिलाल्ये. एवढ तो म्हणाल्यावर त्याचावर बॉम्ब टाकायचा निश्चय मी केला. त्याला सांगितलं मी की माझ्या हेराने मला माहिती दिली आहे की अनन्या गुळवणी  हाय टाईड हॉटेल सोडून बाहेर पडली आणि त्यावेळी तिच्या बरोबर तुम्ही होतात.”
“ याचा परिणाम काय झाला?’’
“ आर या पार असा व्हायला हवा होता. त्याने मला सांगितलं की माझा नक्कीच गैरसमज झाला आहे. माझ्या बोलण्यातील खोच आणि पद्धत, अजिबात आवडलेली नाही. मी अजिबात गुळवणी बरोबर नव्हतो, आणि मी जर तेच वाक्य परत उच्चारले तर त्या विरुद्ध  मी कायदेशीर कारवाई करीन.”
“ अत्ता कुठाय तो?”
माझ्या माहिती नुसार त्याच क्लबात आहे.मी माझ्या माणसाला खात्री करायला तिकडे पाठवलाय पण तिकडे पोचायला त्याला वेळ आहे अजून.”
“ मला भेटायचं आहे त्याला कनक.”
“अरे मग इथेच का नाही येत आणि माझा माणूस माहिती देई पर्यंत इथे बसत ? “
“ कारण मी एकदम पेटलोय आणि माझ्या बरोबर कोणीतरी आहे जो माझ्या पेक्षा गरम आहे.” 
“ अनन्या गुळवणी?”
“ वेडेपणा करू नको “
“ मग तो....”
“ नाव नको घेऊ फोन वरून.”
“ ज्याला भेटायला तू बाहेर पडलास”
“ मला खूप महत्वाची माहिती मिळाली आहे.मिलिंद बुद्धीसागर ला क्लबात गाठण्याची संधी मी घेतोच.मला त्याची मुलाखत घ्यायची आहे “
“ माझे काही मित्र तेल व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यातला कोणीतरी या क्लब चा सदस्य असेलच.तुला गेस्ट कार्ड ची गरज लागेल?”
“ ते असेल तर सुकर होईल बरंच काही.पण वेळ घालवता येणार नाही.मी सरळ क्लब च्या दारात जाऊन मिलिंद बुद्धीसागर ला बोलावणे पाठवीन.त्याने नकार दिला ...”
“ तुला काही अडचण आली तर सांग मला. काय करता येईल ते बघेन मी.” ओजस म्हणाला. पाणिनी ने  फोन ठेवला.गाडीपाशी आला तर  जयकर नव्हता. “  जयकर कुठाय? “
“ त्याला काहीतरी सुचलं., अनन्याकुठे सापडेल हे त्याला खात्रीलायक पणे समजलंय. जिथे ती भेटेल तिथे जावं प्रत्यक्ष, फोन करण्या पेक्षा अस त्यने विचार केला. “
“ कुठे आहे ती या बद्दल काही म्हणाला तो?”
“तू काढून घ्यायला हवं होतंस त्याच्या कडून.त्याला असे मोकळे सोडायची कल्पना मला आवडलेली नाही.”
“ पोलीस पकडतील त्याला? पण त्यांच्या पासून लांब राहण्याचे महत्व त्याला समजलंय.”
” दे सोडून , मी त्याला इथेच वाट बघत थांबायला सांगितले होते.तू ही ऐकले होतेस सौम्या. तू त्याला रोखायला हवं होतंस.” पाणिनी च्या आवाजातून चीड जाणवत होती.
“ त्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली ही ती अचानक येते तशीच अत्ता आली आणि त्याच्या लक्षात आले अनन्याकुठे असेल ते लगेचच त्याला तिच्याकडे जायचे होते.”
“ बरं, कसा गेला तो? एकदम काही त्याने चालायला सुरुवात केली नसेल ! “
“ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हर शी तो बोलला.तो त्याला घेऊन गेला.”
“ त्याचा नंबर काय होता?” कुठली गाडी होती?”
“  नंबर नाही माहीत, काळ्या रंगाची मध्यम आकाराची सेडन होती.बऱ्यापैकी नवी होती.”
“ थोडक्यात तू नीट पाहिलं नाहीस. “
“ खरंच नीट नाही पाहिलं.”
“ माझ्याकडे बघ सौम्या, या तुझ्या वागणुकी वरून वाटतंय की तू वेगळीच सौम्या आहेस. माझा फोन होई पर्यंत तू त्याला थांबवून ठेऊ शकली असतीस. स्पष्ट सांग मला, मोकळी हो.काय करत होतीस तू? कुठे लक्ष होत तुझं?”
“ मी वकिली करत होते.”
“ काय? “
“ हो माझ्याकडे उत्तर होत आणि मला वाटलं की ते उत्तर तुम्हाला  जयकर ला सांगायचं नाहीये. तो सारखाच विचारात होता मी काय करू म्हणून. शेवटी मी त्याला ते उत्तर सांगितले .”
“ ते प्रेमात आहेत, लग्न करायचं आहे त्यांना.मिरगल ने त्यांना आडकाठी केली होती.”
“ थोडक्यात तू त्यांना लग्न करा अस सुचवलंस ! “
“ हो. नवरा , बायको एकमेकांच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाहीत, त्यामुळे तसा सल्ला दिला. तसे ते  आधीपासूनच प्रेमात पडले आहेत, त्यामुळे केवळ अशी साक्ष देता येवू नये म्हणून लग्न केले  असे कोणालाही सिद्ध करता येणार नाही.”
पाणिनी बराच वेळ स्तब्ध राहिला. “ रागावलाय?” सौम्या ने विचारले.
“ ना

ही.”  तो हसून म्हणाला. तुला जे शक्य होते ते तू केलेस. पण आशा आहे की बार असोसिएशन कमिटी  अनधिकृतपणे कायद्याचा वापर केल्याबद्दल तुला ताब्यात घेणार नाही. ! “
सौम्या हसून म्हणाली. ”  त्याने तुम्हाला अशक्य अशा परिस्थितीत आणून ठेवलं होत. तो शेवटी साक्षीदार आहे,तुमचं अशील नाहीये.त्याने तुम्हाला कायदेशीर दृष्टीने महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. उदा.चार गोळ्यांचा हिशोब न लागणे, तुम्ही ही गोष्ट लपवून ठेवली किंवा पोलिसांना सांगू नको असा सल्ला त्याला दिला असता तरी तुमची स्थिती  कायद्याने अडचणीचीच झाली असती. हे समजण्या इतपत मला कायदा कळतो !  “
“ मला हे ही कळल की  जयकर ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा करून त्याची गोष्ट सांगायला लावली रे लावली की ज्युरी, अनन्या गुळवणी  वरील  गुन्हा सिद्ध झाला म्हणून तिला दोषी ठरवतील., जिल्हा सरकारी वकील असं पवित्रा घेतील की  जयकर ला खुनी तरुणीशी विवाह करायला मज्जाव करावा.”
“  जेव्हा तो मला म्हणाला की अनन्याकुठे असेल याचा मला पक्का अंदाज आलाय,आणि ती तिथे असेल तर पोलीस तिथे शोधण्याची शक्यता नाही, तेव्हा मी त्याला सुचवले की पोलिसांनी त्याला तिच्या विरुध्द साक्ष द्यायला भाग पाडण्या पूर्वीच  त्याने आणि तिने युमा  ला जावे आणि लग्न करावे. एकदा लग्न झाले की कायद्याने तिच्या  म्हणजे  बायको च्या विरुध्द त्याला साक्ष देण्यासाठी पोलीस बळजबरी करू नाही शकणार.” 
“ अर्थात सौम्या, हे सगळ खर असल तरी  पत्रकार लोक  त्याचा कसा  अर्थ लावतील तुला माहित्ये.ते पोलीस आणि सरकारी वकिलांची विधाने घेतील, त्यातून असं प्रतित करतील की अनन्याखुनी आहे पण सिध्द करता येऊ नये म्हणून तिने घाई घाईत लग्न उरकले.”
“ सर, परंतू हे सर्व करायला त्यांना वेळ लागेल आणि तो पर्यंत तरी तिला थोडा अवधी मिळेल आयुष्य जगायला. नाहीतर एकदा का ती तुरुंगात गेली तर बाहेर सुटून येई पर्यंत तिच तारुण्य संपलेलं असेल तिचा प्रियकर गेलेला असेल.  जयकर काही दिवस दु:खात काढेल, नंतर एखादी सहानुभूती दाखवणारी मुलगी त्याच डोक तिच्या छातीवर ठेऊन हळुवार थोपटेल,त्याच्या केसातून हळुवार हात फिरवेल,त्याच्यावर बहिणी सारखी माया करते आहे असे दाखवून शेवटी त्याची पत्नी होऊन जाईल ! “
“ सौम्या, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुला नाही वाटत की  थांबायची तयारी दाखवण्या इतकं त्याचं तिच्यावर प्रेम आहे.”
“ अत्ता आहे,पण इतकी वर्षे थांबायची तयारी कोण दाखवतो? लग्नाच्या बाजारातली स्पर्धा बघा,एखादी चुणचुणीत पोरगी, वाटच बघत असेल बहिणी सारखी सहानुभूती दाखवायची संधी मिळत्ये का याची.”
‘’ तू जिंकलीस सौम्या ! तू हे केलंस मला आनंद झाला.आपण तिला शोधण्यात यशस्वी झालो असतो तर मी तिला  युमा किंवा लास वेगास सुचवले असते आणि लग्न.”
“ तुम्ही तिला काहीच सुचवलेले नाहीये सर. वकील म्हणून तुमची विवेक बुध्दी आणि कर्तव्य याचा योग्य वापर तुम्ही केलाय. मी त्याला स्पष्टच सांगितलं की वकील म्हणून तुम्ही त्याला कधीच सल्ला देणार नाही की तिच्याशी लग्न कर म्हणजे तिच्या विरुध्द साक्ष देण्याची वेळ येणार नाही.पण तू स्वतःहूनच ते करू शकतोस.”
“ ठीक आहे सौम्या, मला मिलिंद बुद्धीसागर चा तपास लागलाय जाऊया भेटायला त्याला. आणि बघू काय म्हणतोय तो “
“.मी पैजेवर सांगते सर, की एखाद्या सदाचारी माणसाला सात्विक संताप येतो तसा आव तो आणेल, आपण अनन्याच्या जवळपास असल्याचे सुद्धा तो नाकारील.”
“ त्याने कनक  च्या बाबतीत आधीच हे सगळ केलय ! “ 
“ समजा व्यक्ती ओळखण्यात चूक झाल्याचा हा प्रकार असेल तर? “
“ तसे असेल तर मी फार मोठी जोखीम घेतोय. पण मला नाही वाटत. कारण मिलिंद बुद्धीसागर हा अत्यंत थंड डोक्याचा , सभ्यतेचा बुरखा पांघरलेला खोटारडा आहे.”
“ तुम्ही तो बुरखा फाडू शकता?”
“ मी प्रयत्न करू शकतो.”
पाणिनी ने क्लब च्या बाहेर  गाडी नेऊन थांबवली. “ साक्षीदार लागणार आहे तुम्हाला ? “ सौम्या ने विचारले.
“ लागेल, पण बहुतांशी भाग मी साक्षीदारा शिवाय च पूर्ण करून टाकतो. सध्या गाडीतच थांब आणि किल्ला लढव.”
पाणिनी ने क्लब च्या दाराची घंटा वाजवली. रंगीत पोषाखातल्या एका नोकराने दरवाजा  उघडला.पाणिनी ने त्याचे नाव आणि येण्याचा उद्देश सांगितला.तो माणूस दार लाऊन आत गेला.साधारण दोन मिनिटांनी,दार उघडले. एक शिडशिडीत, चांगला पोषाख घातलेला , भेदक घाऱ्या डोळ्यांचा तिशीतील एक माणूस दारात उभा होता.त्याने हात पुढे केला.” पाणिनी पटवर्धन? “ त्याने विचारले 
“ बरोबर , आणि तू मिलिंद बुद्धीसागर  बुद्धीसागर ? “ पाणिनीने विचारले. दोघांनी हस्तांदोलन केले.
“ मला माफ कर , मी आत नाही बोलाऊ शकत तुला.आत मधे क्लब चे इतर सभासद आहेत आणि आपल्यातील चर्चेचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो.”
“ अगदी काही हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. “ माझी गाडी इथेच बाहेर आहे आपण त्यात बसून बोलू.”
“ तू एकटाच आहेस का?”
“ माझी सेक्रेटरी माझ्या बरोबर आहे.”
“ तस असेल तर आपण त्या कमानीच्या कोपऱ्या पर्यंत जाऊ, तिथे चांगलं आहे बोलायला.” ए

वढे बोलून तो पाणिनी च्या संमतीची वाट न बघता झपझप चालत कमानीच्या कोपऱ्या पर्यंत पोचला
“ आज रात्री मला एक चीड आणणारा अनुभव आला.” तो म्हणाला.
“ हो? “
“फोन वरून कोणीतरी , गुप्तहेर संस्थेचे वगैरे असतील बहुदा, खात्रीलायक पणे  म्हणत होते की मी संध्याकाळी अनन्या गुळवणी बरोबर होतो म्हणून”
“ तुला ते लाजिरवाणे वाटले?”
“ त्यापेक्षा सुद्धा चीड आणणारे वाटले असे म्हणणे योग्य होईल. कारण मी नव्हतो तिच्या बरोबर.”
“ तुमची ओळख आहे?”
“ अर्थातच.”
“ तर मग तुम्ही एकत्र होतात अस कोणीतरी सुचवल तर त्यात चीड येण्याजोगे काय आहे?”
“ सरळ सरळ सांगतो मी. माझी पत्नी खूप हुशार, आकर्षक आणि मोठया मनाची आहे पण शेवटी ति स्त्री आहे.तिच्या मनात असतं की आम्हा दोघांमध्ये काही लफडं आहे. या तिच्या समजुतीला काहीही आधार नाही पण वाटतंय तिला तसं तर काय करणार?त्यामुळे मी तिच्या बरोबर होतो असं खोचक पणे बोलल गेलं तर मला राग येतो. त्या गुप्त हेराची नेमणूक कोणी केली आहे माहीत नाही पण असं विधान साक्षीदाराच्या समोर केलं गेलं किंवा वर्तमान पत्राला दिल किंवा छापलं तर त्याला जबाबदार असणाऱ्या विरुध्द मी दावा ठोकेन. माझी भूमिका मी  स्पष्ट केली आहे ना?”
“  एकदम स्पष्ट केली आहे.”
“ तर मग या पार्श्वभूमीवर मी उत्तरं द्यायला तयार आहे त्यामुळे गैरसमज दूर होतील.पण मी तुम्हाला आधीच इशारा दिलाय लक्षात ठेवा.”
“ दुसऱ्या शब्दात, तुम्ही तिच्या बरोबर होतात अस मी दुसऱ्या कोणाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावर नुकसान भरपाईचा दावा लावाल?”
“ मी ते विधान खोट आहे अस जाहीर करीन आणि त्यामुळे मला घरी त्रास झाला, तर ... ओह पाणिनी पटवर्धन तुम्ही वकील आहात तुम्हाला काय सांगायचं? तुमच्या निर्णयावर माझा विश्वास आहे.”
“ ठीक आहे. इथे फक्त तू आणि मी आहोत कोणी साक्षीदार नाहीये., तुम्ही दोघे एकत्र होतात का?”
“ निश्चित पणे नव्हतो.”
“ तिने तुला दुपारी फोन केला होता?”
“ नाही.”
“ ती हाय टाईड नावाच्या हॉटेल मधे होती हे तुला कोणत्यातरी माध्यमातून कळल होत का?”
मिलिंद बुद्धीसागर गडगडाटी हसला, ते हास्य अस होत की पाणिनी ने विचारलेले सर्व हास्यास्पद प्रश्न त्याने पार झाडून टाकले गेले. “ अरे, तुला खोटे अहवाल सादर करून ती गुप्तहेर संस्था तुला उल्लू बनवत्ये लक्षात घे, त्यांना तसे करू देऊ नको.तुला अनुभव असेलच की हे लोक असे अहवाल पाठवतात की त्यातून त्यांना आणखीन काम दिले जाईल. त्यांच्या ग्राहकांना काय हवंय ते त्यांना ..”
“ हाय टाईड हॉटेल ची मॅनेजर म्हणाली की तुझ्या व्यक्तिमत्वाशी जुळणारा एक तरुण मर्सिडीज गाडीतून आला,अनन्यागाडीत बसली आणि तो निघून गेला.”
“ ती खूप लोकप्रिय अशी गाडी आहे.हजारो लोकांनी ती घेतल्ये. तसच मी पैजेवर सांगतो की माझ्या सारखे व्यक्तिमत्व किंवा देहयष्टी असणारे,लाखो लोक असतील.”
“ आणि”   जणूकाही मधे मिलिंद बुद्धीसागर बोललाच नाही असे समजून पाणिनी आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला, “मॅनेजर म्हणाली की गाडी चालवणारा आपली गाडी शेजारच्या पेट्रोल पंपाकडे घेऊन गेला.
त्या पंपाचे व्यवहार तपासल्यावर तुझी गाडी चालवणारा आणि तुझे क्रेडिट कार्ड वापरणारा जो कोणी होता, त्याने पेट्रोल भरले आणि स्लीप वर केलेली सही तुझ्या सही शी जुळत्ये ! “
पाणिनी ने एवढे बोलून आपले बोलणे बंद केले.मिलिंद बुद्धीसागर ने त्याच्या कडे भीतीयुक्त आश्चर्याने पाहिले. पाणिनीने सिगारेट शिलगावली. जवळ जवळ तीस सेकंद त्या जीव घेण्या शांततेत गेल्यावर मिलिंद बुद्धीसागर ने विचारले
.” हे आणखी कोणाला माहित्ये पाणिनी पटवर्धन?”
“ मला माहित्ये, मी नेमलेल्या गुप्तहेर संस्थेला आणि आता पोलीस जेव्हा त्या मॅनेजर ची मुलाखत घेतील तेव्हा त्यांना माहिती होईल.”
“ ओह शी: ! त्या शेजारच्या पंपावर जाण्याचा गाढवपणा केल्या बद्दल मीच मला लाखोली वाहतोय ! मला कल्पनाच नव्हती की माझा पाठलाग होतोय ! “
“ जेव्हा आकर्षक अशा स्त्रिया एकट्याच येऊन हॉटेलमध्ये राहतात आणि त्यांना भेटायला छान कपड्यातले रुबाबदार तरुण महागड्या गाड्यामधून येतात, तेव्हा हॉटेल चे मॅनेजर्स  अधिक चौकस होतात.”
मिलिंद बुद्धीसागर ने आपली बोटे दोन तीन दा रागाने आपटली. “ सिगारेट ?” पाणिनीने विचारले.त्याने मान हलवून नकार दिला. “ मग ? “ थोड्या वेळाने पाणिनी ने विचारले.
“ मी विचार करतोय. “
“ विचार करणे योग्य नाही होणार.”
“ म्हणजे ? “
“ तू विचार करतो आहेस म्हणजे मला पटेल अशी  कोणती तरी कथा रचू पाहत आहेस. अस नको करू.”
“ का नको? ”
“ माझं समाधान होईल एखाद्या रचलेल्या गोष्टीमुळे पण पोलीसांच नाही होणार. म्हणजे सुरुवातीला होईल कदाचित पण ते टिकणार नाही. तू काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तुला रंगे हाथ पकडल तर तू संपलास म्हणून समज.”
“ सत्य हे दुर्दैवाने विचित्र  आहे.”
“ नीट ऐकून घे, तू खुनाच्या प्रकरणात गुंतला आहेस. कितीही विचित्र वस्तुस्थिती असली तरी ती दडवण्यासाठी परिपूर्ण  अशी गोष्ट तू रचू शकणार नाहीस कारण नंतर पुढे मागे सत्य काय

 ते चव्हाटयावर येणारच आहे.मग तुला तुझी रचलेली कथा बदलावी लागेल. ती बदललीस तर सत्य आणखी दसपट भेदक होईल.”
“ अनन्याला मदतीची गरज होती.” मिलिंद बुद्धीसागर म्हणाला.
“ आर्थिक ? “
“ ती तसे काही म्हणाली नाही.”
“ मग काय स्वरुपाची मदत?”
त्याने निराश होऊन पुन्हा बोटे आपटली. “ शांत हो.” पाणिनी म्हणाला.” खोट बोलून पुन्हा गर्तेत जाशील.”
“ मला खोटेपणाचा आरोप केलेला आवडत नाही. तुमच्या माहिती साठी सांगतो पाणिनी पटवर्धन, मी खोटे बोलत नाही.”
“ मिनिटा पूर्वीच तू माझ्याशी खोट बोललास,माझ्या हेराशी खोट बोललास,आणि वेड लागल्या सारखा पुन्हा एक मोठ असत्य रचून सांगायच्या प्रयत्नात आहेस.”
पाणिनी चा आवाज भावनाहीन,संयमी, सहनशील आणि राग न आणणारा होता.मिलिंद बुद्धीसागर ने आपले खांदे पाडले, पाणिनी च्या वज्रासारख्या टणक शरीर यष्टी कडे पाहिले आणि निराशेने हसला.”
“ मी त्यावेळी जरा जोशातच होतो; नाहीका?  तरीही वस्तुस्थिती बदलत नाही की मी असं सराईत खोटारडा नाही.”
तू एखाद्या मैदानी खेळाडू सारखा दिसतोस. काय खेळतोस तू? टेनिस?” पाणिनी ने विचारले.
“ कसं ओळखलस तू?”
तुझ्या खांद्या चा आकार, ज्या पद्धतीने तू चालतोस त्यावरून. कसा खेळ आहे तुझा?”
“ खूप चांगला. स्पर्धेत नाही खेळलो बरेच दिवसात पण सराव खूप करतो.”
“ चांगला टेनिस पटू होण्यासाठी सरावाची गरज असते. खोट बोलण्यासाठी तुझा फारसा सराव झालेला नाहीये. पोलिसांना  आणि पेपर वाल्यांना वेड करायचं असेल प्रचंड सराव हवा खोट बोलण्याचा.”
“ ठीक आहे मी तुम्हाला सगळ सरळ सरळ  सांगतो.माझं बोलणे मात्र गोपनीय ठेवा मी...”
“ मी तशी काहीही हमी देत नाही , मी माझ्या अशीलाचे प्रतिनिधित्व करतोय.”
“ मग मी काही सांगू शकत नाही.”
“ पोलीस सुद्धा तुझे बोलणे गोपनीय ठेवण्याची हमी देणार नाहीत. पेपर वाले पण देणार नाहीत.”
मिलिंद बुद्धीसागर त्यावर जरा विचारात पडला. पाणिनी ने सिगारेट चे टोक बुटाने जमिनीवर चुरगळले.
“ अनन्या मला आवडते. बायकोला ज्या पद्धतीने वाटतंय तशी नाही पण ती चांगली मुलगी आहे.तिला मिरगल कडून कायमच वाईट वागणूक मिळाली. हर्षल मिरगल माझ्या बायकोचा नातलग होता. माझा नाही.बायको त्याची एकमेव नातलग होती.मिरगल च्या मालकीची काही इस्टेट आहे. माझा त्यावर डोळा नाही पण बायको त्याची एकमेव वारस आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मी मूर्ख नाही त्याचा विचार न करायला.! “
“ मला अनन्याबद्दल नेहेमी सहानुभूती वाटायची माझ्या बायकोला , लीना  ला बिलकुल नाही.  तिच्या मनात कायम असायचं की एक ना एक दिवस अनन्यामिरगलला अडकवेल आणि मृत्युपत्रानुसार मोठा हिस्सा मिळवेल.”
“ अनन्याच्या जन्माबद्दल काही उलट सुलट प्रवाद आहेत.ती अनौरस मुलगी आहे.मिरगल ला तिची ही पार्श्वभूमी माहिती आहे. निमिष जयकर च्या कुटुंबाशी मिरगल चे मैत्रीपूर्ण संबंध होते.  जयकर आणि तिच लग्न त्याला नको होत.”
“ कारण काय?”
ती अनौरस असल्याने  जयकर चे कुटुंब ही गोष्ट स्वीकारणार नाही म्हणून.”
“  स्वतः अनौरस असल्याच अनन्याला माहीत होत?”
“ मला नाही वाटत तसं “ 
“ मिरगल तिचा बाप होता का?”
मिलिंद बुद्धीसागर जरा घुटमळला. “ नाही “ तो म्हणाला.
“ ठीक आहे सांगत रहा पुढे, तू चांगली सुरुवात केली आहेस. पण फार वेळ न घालवता सांग. आपल्याला किती वेळ हातात आहे माहीत नाही.”
“औषधाच्या गुंगीत तिने डॉक्टरांना किती सांगितलं आणि नंतर किती माहीत नाही पण मी समजतो की उरलेल्या गोळ्या तिने तळ्यात टाकल्या. गोड गोळ्यांची बाटली अर्धवट भरलेली बाटली घरात होती त्यात मी बंदुकीच्या शिशाच्या गोळ्या भरून ती त्याच तळ्यात टाकली. नंतर मी अनन्याने मला फोन करावा म्हणून निरोप ठेवला. कारण माझ्या बायकोची  माझ्यावर घारीची नजर असल्याने मी फोन करू शकत नव्हतो तिला.तिला निरोप मिळाला तेव्हा तिने मला फोन केला.पण लीना  असल्याने मला बोलता येईना त्यामुळे मी राँग नंबर आल्याचं नाटक केलं. शेवटी माही बायको जेव्हा तुम्हाला भेटला गेली, तेव्हा अनन्याशी बोलायची संधी मिळाली.”
“ तू बाटली कधी टाकलीस  तळ्यात?”
“ काल रात्री”
“कोणी पाहिलं नाही तुला? आणि हाताचे ठसे?”
“ कोणी नाही पाहिलं. बाटलीवर  ठसे न उठण्याची मी दक्षता गेतली होती.”
“ तुला गोड गोळ्या आणि बाटली कुठे मिळाली?”
“ आम्ही त्याच गोळ्या वापरतो. साखरेला पर्यायी गोळ्या म्हणून. माझ्या बायको मुळेच हर्षल मिरगल त्या वापरू लागला होता. मला अनन्याला सांगायचच होत की काळजी करू नको. पोलिसांना बाटली शोधू दे, ते जेव्हा शोधतील तेव्हा त्यात साध्या गोळ्याच सापडतील आणि दिलेला कबुली जबाब आपोआपच अर्थहीन होईल. नंतर मला समजलं की पोलिसांनी ती बाटली शोधली. आणि आता सर्व विषय संपला.”
“ आता मी तुला उरलेली कथा ऐकवतो.पोलिसांनी दुसऱ्यांदा शोध घेतला, त्यांना आणखी एक बाटली मिलाल्ये.त्यात विषारी गोळ्या आहेत त्यामुळे संपलेला विषय परत सुरु झालाय.ते अनन्याला शोधताहेत.ती सापडली की तिच्यावर खुनाचा आरोप ठेऊन अटक केलं जाईल.पोलिसांना वाटतंय की साध्या गोळ्यांची बाटली तळ्यात टाक

ण्यात मी जबाबदार आहे.”
“ बापरे ! मी जे काय केलंय त्याला प्रसिद्धी मिळाली तर माझं वैवाहिक जीवन उध्वस्त होईल. लीना मला घटस्फोट देईल. परत एकदा नैराश्याने त्याने बोटे आपटली.
“ पोलीस तुझ्याशी बोलू इच्छितात. तू काय सांगणार त्यांना?”
“ मी खोटे सांगेन त्यांना काहीतरी बनवेगिरी करून.”
“ तस काही करू शकणार नाहीस तू.”
“ एक मिनिट ऐक, तू अनन्याचा वकील आहेस. तू यात गुंतला आहेस , पोलिसांना वाटतंय की साध्या गोळ्यांची बाटली तू फेकली आहेस तळ्यात.”
“ बोल, तू. चालू ठेव त्याच पद्धतीने, जेव्हा तू तर्कशुद्ध विचारांती निष्कर्ष काढशील, तेव्हा तुलाच कळेल की तुझी मान फासात अडकली आहे.”
“ गेलास उडत तू. !  तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी तू मला सल्ला देतो आहेस. पोलिसांना वाटलं की तू बाटली टाकलीस तर मी दोषमुक्त होईन.तुझ्यावर ते बालंट येईल.”
“ आणि तुला आवडेल ते?”
‘ माझ्या म्हणण्याचा उलटा अर्थ काढू नका.माझी पत्नी मला अनुकूल अशी साथीदार आहे.तसा मी सुखी आहे.तिला एक लाभ दायक अशी इस्टेट वारसाने मिळते आहे.तुम्ही जसे तुमच्या हिताचे बघताय तसे मी माझ्या हिताचे बघायचे ठरवले आहे. मी माझा स्वतःचा वकील बघेन” तो उद्गारला आणि दाणकन दार आपटून आत गेला.”
पाणिनी पुन्हा आपल्या गाडीत जायला निघाला. “ काय झाले?” तो गाडीत आल्यावर सौम्या ने विचारले.
“ मला वाटायला लागल की मी तुला साक्षीदार म्हणून नेलं असतं तर बर झालं असतं.”
“ का? काय म्हणाला तो? “
“ तो आधी बरंच काही बोलला पण शेवटी जे बोलला तेच महत्वाचं होतं”
“ काय म्हणाला शेवटी?”
“ वेगळा वकील बघणार आहे तो स्वतः साठी.”
“ त्याच्या कडे लपवण्यासारखे काय आहे की वकील द्यावा लागतोय त्याला?”
“ त्यानेच त्या साध्या गोळ्यांची बाटली आत शिसे भरून तळ्यात टाकल्ये.”
सौम्या एकदम उत्तेजित झाली आणि उद्गारली,” अहो काय सांगताय ! त्याने मान्य केले हे? “
“ केले ,  पण फक्त माझ्या समोर.पिंजऱ्यात उभा राहील तेव्हा धादांत खोटे सांगेल तो.”
“ मग आपण काय करायचे आता? “
“आता आपण खायचे “ पाणिनी म्हणाला.
सौम्या ने काय घडले असावे त्याचा अंदाज बांधला, नंतर जरा अलिप्त पणे म्हणाली. “ आता मला नाही खायचे.”

प्रकरण 11 समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel