विदर्भ देशाच्या एका राजाला तीन मुलें होती. त्याची पहिली राणी वारल्यावर त्याने दुसरे ला केले. सावत्र आईनें मुलाला त्रास देऊ नये म्हणून त्याने आपल्या तिघां मुलांना एका निराळ्या राजवाड्यांत ठेवले. त्या वाड्यांत सर्व सुखसोयी होत्या. काही दिवसांनी दुसन्या राणीला मुलगा झाला. तिला वाटू लागले की तिच्या सवतीची मुलें जिवंत असेपर्यंत तिच्या मुलाला राज्य मिळणे शक्य नाही. तिने ही गोष्ट आपल्या एका दासीला सांगितली. ती दासी स्वभावाने मंथरेसारखीच दुष्ट व कुटिल बुद्धीची होती. दासी म्हणाली-"मी एक उपाय सांगते. तूं तिघांना केव्हा तरी बोलावून सोंगट्या खेळायला सांग. त्यांत जो हारेल त्याने ऋतुपर्ण राजाकडून तीन घोडे आणून द्यावेत.

माझ्या जवळ जादृचे फासे आहेत. तुझा मुलगा डाव जिंकणार हे निश्चित. ऋतुपर्ण राजाकडे जाऊन घोडे आणणे म्हणजे मृत्यूच्या मुखांतून परत येणे आहे. कारण राजा मागून देणार नाही आणि घोडे चोरी करून आणण्याचा प्रयत्न केल्यास राजा जिवंत सोडणार नाही.” राणीला त्या दुष्ट दासीचा सल्ला पसंत पडला. राणीने एका सणाच्या दिवशी तिर्धा राजकुमारांना जेवायला बोलाविलें. जेवणे उरकल्यावर सर्व सोगव्या खेळायला बसले. त्यांनी अट कबूल केली होती आणि खेळांत हारले. म्हणून ठरल्याप्रमाणे तिघांना ऋतुपर्ण राजाचे घोडे आणावयास जावे लागलें. तिधे त्याच दिवशी आपापल्या घोड्यांवर बसून ऋतूपर्ण  राजाच्या राज्याकडे निघाले. वाटेंत त्यांना एक घोडेस्वार भेटला. त्याचे सगळे कपडे काळे होते. त्याने त्यांना विचारले- तुम्ही कोण व इकडे कोठे आलोत ? काय काम आहे तुमचे १५. " आम्ही विदर्भ देशाचे राजकुमार आहों आणि ऋतुपर्ण राजाचे विलक्षण घोडे घेऊन जाण्यास आलो आहो." राजकुमार म्हणाले. "बरें झाले की आमची तुमच्याशी भेट झाली. ते घोडे घेऊन जाण्यासाठी जो कोणी आला तो जिवंत परतला नाही हे तुम्हाला माहीत असेलच. मी या भागांतला एक अट्टल चोर आहे. मला काळा चोरम्हणून लोक ओळखतात. मी सुद्धा ते घोडे चोरण्याचे साहस आजपर्यंत केले नाही. पण मी तुम्हांला माझ्याकडून होईल तितकी मदत करावयास तयार आहे." काळा चोर महणाला. मध्यरात्रीच्या सुमारास काळा चौर गुप्त- मार्गाने राजकुमारांना किल्ल्यांत सरळ राजाच्या तबेल्याकडे घेऊन गेला. राज- कुमारांनी घोड्याच्या पायांच्या दोर्या सोडल्याबरोबर घोडे खेकाळू लागले. त्यांचे खेकाळणे ऐकून पाहारेकरी जागे झाले आणि त्यांनी राजकुमार व काळ्या चोराला धेरले आणि त्यांच्या मुसक्या बांधून राजा- समोर नेऊन हजर केलें, आपल्या घोडयाना चोरून नेणान्यांना शिक्षा देण्यासाठी राजाने एक मोठी कढई। तयार केली होती. त्या कढईत उकळल्या तेलांत गुन्हेगारांना बुचकळून काढावयाचे ही शिक्षा राजा देत असे. राजाने काळ्या पोराला विचारलें- तुझ्या नादी लागून कशाला या बिचान्यांनी स्वतःवर हे संकट ओढवून घेतले! यांना मी काय शिक्षा देणार आहे, तुला माहीत आहे का ! ती पहा कढई

आणि त्यांत तापत असलेले तेल ! मरण  किती जवळ येऊन ठेपलें आहे हे माहीत आहे ना तुला?" राजाने विचारले. महाराज ! पण माझें मरण या पेक्षा अधिक जवळ आले असूनहि मी त्या संकटांतून सुटलो होतो." काळा चोर म्हणाला. "तू म्हणतोस ते खरें निघाले तर मी याला मुक्त करीन !" राजा म्हणाला. काळा चोर, तो मृत्युमुखांतून कसा सुटला याची गोष्ट सांगू लागला- कें मी एका सरदार घराण्यांत जन्मास आलो. परंतु तीन राक्षसिणीनी मिळून माझी सर्व धनदौलत लुबाडून घेतली. म्हणून मला हा चोरीचा धंदा स्वीकारावा लागला. त्या तिन्ही राजकन्याच होत्या. परंतु शापाने त्यांना राक्षसिणींचें रूप मिळाले होते. त्या तिन्ही दिवसभर सुंदर राजकन्या दिसत. पण रात्र झाली की राक्षसिणी होत. त्यांनीच माझी सर्व संपत्ती चोरून नेली आणि मला शिकारी करून सोडले. एके दिवशी मी त्यांना पकडावयाचे ठरवून त्यांच्या पाठीमागून निघालो. त्या एका गुहेत शिरल्या. मी देखील त्यांच्या पाठोपाठ आत गेलो. डोंगरापलीकडच्या एका नदीकाठी त्या गुहेचे दुसरें तोंड निघाले. तेथे एका खड्यांत त्या रहात असत. चुलीवर एका मोठ्या मडक्यांत त्यांचा सैपाक सुरू झाला. तिघी चुलीच्या चारी भाजूला बसून गप्पा मारीत होत्या. त्यांच्या गप्पा ऐन रंगांत आल्यावर मी एक मोठी धोंड उचलली आणि मडक्याला मारली. मडके फुटले आणि त्या तिघींचें अंग भाजले. त्यांनी मला पाहिले व धरायला धांवल्या. मी पळालों पण त्यांच्या हातून

सुटका मिळणे अशक्य झाल्यावर एका झाडावर चढलो. एका राक्षसीने लगेच दुसरीका दोन्ही हातांनी धरून उचलले, त्या बरोबर तिची कुन्हाड झाली. तिसरी एक कुत्रे होऊन खाली पडल्याबरोबर मला धरून खाण्यासाठी भावाखाली स्पून बसली. पहिल्या राक्षसिगीने कुन्हाडीनें झाड तोहायला सुरवात केली. तिनं दोन घावांत अर्थे अधिक झाड कापलें, तिसरा पार मारण्यासाठी हात उनलल्या परोपर कोबडा आरवला. तेंव्हाच तिघांना राजकन्येचे रूप मिळाले आणि त्या आपल्या वाड्यांत परत गेल्या.

इतकी गोष्ट सांगून काज्या चोराने विचारले "महाराज! आता आपणच सांगावें की आपण म्हणाला त्यापेक्षा कठीण प्रसंग माझ्यावर ओतबला होता की नाहीं। राजा म्हणाला-"तुझे म्हणणे बरोबर आहे. तर मग मी सर्यात छोट्या राज- कुमाराला आपल्या वचनाप्रमाणे नाफ करतो. पण या मधल्याला मी सोडणार नाही. सांग, बा मरण जवळ आले आहे की नाही।" काळा पोर म्हणाला " महाराज, माझे मरण पाहि पेक्षा जास्त जवळ आलें असूनहि मी घटका मिळविली आहे."

मला हे खरे वाटत नाही , पण तुझे म्हणणे खरे निघाले तर मी या राजकुमारालाहि माफ करीन.” राजा म्हणाला. काव्या चोरानें गोष्ट सांगावयास सुरवात केली. # मी त्या राक्षसिणींचे मडके फोडून त्यांना एक दिवस उपाशी ठेवले याचा त्यांना राग आला व त्यांनी सूड घेण्यासाठी माझे सर्वस्व लबाडून मला या चोरीच्या अंधांत ढकलेलें, एके दिवशी रात्री मी एका शेतकम्याची म्हैस व गाय चोरी करून घेऊन चाललो होतो, चालून चालून अगदी दमून गेलोंहोतो. थोडासा विसावा घेण्यासाठी एका झुपडाखाली जाऊन बसलो. म्हशीला व गाईला झाडाला बांधून ठेवले. पोड्या वेळाने पाहतों तो आठदहा वाघ पळत येत असलेले मला दिसले. त्यांना म्हशीचा व गाईचा बास लागला असावा. त्यांना पाहतांच मी झाडावर चढून बसलो. वाघांची मेजवानी सुरू झाली. मी चोरून आणलेला माल अशा तम्हेनें फस्त होऊन गेला. भी तोडा- बाटे एक शब्द देखील काढला नाही. सर्व अंग थरथर कापत होते. त्यांना माझा वास देखील आला की काय कोणास ठाऊक

त्यांनी वर पाहिले आणि पर चालून येण्याचा विचार करू लागले. त्यांनी झाडाच्या बुंधाका आपली नखे घासून साफ केली. त्यांच्या धक्याने मी खाली पडणारच होतो  परंतु माझे नशीब दांडगें. आठ आठ दहा दहा सिंह त्याच वेळी कोठून तरी धांवत बाले आणि वाघा-सिंहाची युद्ध सुरू झाली. एका मागून एक वाघ सिंह मरून पडत होते. मी वर बसून ते भयंकर दृश्य  पहात होतो. आता फक्त एक वाघ आगि एकच सिंह उरले होते व त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. 

तेवढ्यांत सोसाट्याचा वारा सुरु झाला. मी फांदी घट्ट धरून बसलो होतो. पण झाडाच मुळासकट उपटून खाली पडले आणि मला वाटले, आता ते वाघ सिंह माझ्यावर तुइन पटणार. पण झाडच त्यांच्या अंगावर पडलें बते तेथेच ठार झाले. मी हात जोडून देवाला नमस्कार केला. इतकी गोष्ट सांगून काळाचोर म्हणाला. “आतां म्हाराज तुम्हीच सांगा की मी मरणाच्या अधिक जवल होतो की हा राजकुमार 'तुझे म्हणणे बरोबर आहे. मी या दुसऱ्या राजकुमारामहि माफ करतो. आता या मोठ्या राजकुमाराला कढईत टाकावला सांगतो. मला वाटते मरण इतकें जवळ आलेले कोणी कों पाहिले नसेल व ऐकलेंहि नसेल." राजा म्हणाला. "का महाराज! मी तर वाहून जास्त कठिण प्रसंगांतून आपली सुटका करून बाहेर निघालो आहे!" काळा चोर म्हणाला. "तूं म्हणतोस तें सत्य निघाले तर मी मोठ्या  राजकुमारालाहि माफ करीन." राजाने असें म्हटल्याबरोबर काळ्या चोराने गोष्ट सांगावयास सुरवात केली.

अट्टलचोर म्हणून माझी कीर्ति देश देशां- सरांत पसरली. पुष्कळ लोक या कलेचा अभ्यास करण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले. त्यांपैकी एक जण फार हुशार होता. त्यानें मला देखील एकदा फसविलें. मी ज्या भागांत चोरी करीत असे त्या भागांत एक राक्षस असे तो घरफोडीव खून हेच धंदे करीत असे. त्याने पुष्कळ सोने व चांदी चोरी करून एका विहिरीत जमा केली होती. खरे पाहता तो त्याच विहिरीत रहात असे. एकदां राक्षस आपल्या घरांत नाही असें पाहून आम्ही त्या विहिरीजवळ गेलो. दोरी आंत सोडून मी आपल्या शिष्याला आंत उतरायला सांगितले. विहिरीत उतरून एका मोठ्या पोत्यांत सोने चांदी भरावयास सांगितले. पण तो म्हणाला-"मी उतरून जाईन पण चढून बाहेर येऊ शकणार नाही. आपणच उतरावें. मी पोते वर ओढून घेऊन पुन्हां दोरी विहिरींत सोडीन मग आपण वर यावें." मी त्याच्या बोलण्यावर विश्वास केला आणि विहिरीत उतरलो. मी सोने चांदी भरगच्च भरून पोत्याच्या तोंडाला दोरी बांधली. माझ्या शिष्याने पोते वर ओढून

घेतलें, त्याने पोते सोडून घेतले. पण दोरी मात्र पुन्हां सोडली नाही. मी विहिरीत ओरडत होतो की दोरी सोड. पण तो हसून म्हणाला-"गुरुवर, आपण मला सर्व विद्या अवगत करून दिल्यांत. परंतु दोरी- शिवाय चढून वर कसे यावयाचे हे शिकविलें नाहीत. हे आपण आज शिकवावे. विहिरीत उरलेलें सोने सर्व आपलें. मी त्याच्यावर अधिकार सांगणार नाही." असे सांगून तो निघून गेला. आता काय करावे मला सुचेना. आतां राक्षस येणार व उसासारखा आपणांस खाणार. मी अगदी घाबरून

गेलो. तेव्हड्यांत मला एक युक्ति सुचली. विहिरीत एका बाजूला काही मढी पडली होती. राक्षस येण्याची चाहूल लागताच मी त्या मृत शरीरा सारखाच पढून राहिलो. काळोख पडल्यावर राक्षस आणखी काही मढी घेऊन आला व त्याने इतर मढ्यात ती मढी पण टाकली. त्याचे माझ्याकडे लक्ष गोले नाही. त्याने त्यानंतर सैपाक करण्या- मोठी पूर पेटवली. ती चूल म्हणजे एक मोटी भट्टीच समजा. एक मोठी कढई चुलीवर टेवली खाली मोठा जाळ केला. नंतर तो एक टोपले घेऊन आला व त्यांत तो मढी कढईत टाकू लागला. एका खेपेस त्याने मला सुद्धा इतर टोपल्यांत टाकले, पण मी सावध होतो व मी टोपल्याच्या कडेला धरून उभा राहालो, राक्षसानें टोपले बाजूला फेकून दिले आणि रौपाक तयार झाल्यावर साऊन पिऊन मन घोरत पडला. राक्षसाचे धोरणे माझ्या कानावर पडल्या नंतर मी टोपल्याच्या बाहेर आलो. राक्षसाने विहिरीन उतरण्यासाठी एका शिडीचा उपयोग केला होता. मी याच शिडीवर चालून बाहेर आलो. 

सांगून विचारले " महाराज! आता आपणच सांगा की राजकुमाराचे मरण माझ्यावर आलेल्या मरणापेक्षा जास्त जवळ येऊन ठिपलें होतें का!" राजा म्हणाला-" नाही! मी या राज- कुमारालाहि माफ करतो. आता हे तिथे राजकुमार मोकळे आहेत. त्यांना वाटेल तिकडे जायला माझी परवानगी आहे. पण मी आता तुलाच कढईत टाकायला सांगणार आहे. मरण इतके जवळ येऊन ठेपलेले तुला आठवत नसेल,

"का? मला आठवतें. मी मृत्यूच्या अगदी मुखात पडून सुद्धा जिवंत सुटलों आहे." काळा चोर म्हणाला. "हां, कोठे। शक्यच नाही." राजानें म्हटल्यावर काळ्या चोराने गोष्ट सांगावयास सुरवात केली. एकदा नी कोठे तरी चोरी करायला म्हणून जात होतो. एका घरांत एक बाई तान्या मुलाका मांडीवर घेऊन बसली होती व रडत होती. तिच्या हातांत एक सुरी होती. तें मूल रडत होते. ती बाई सुरी वर करून त्याला मारणार इतक्यात ते मूल कसे कोणास काय ठाऊक हसू लागले. त्याचे ते विचिरत्र हसणे पाहून त्या बाईने सूरी बाजूला टाकली अन त्या मुलाकडे कैतुकाने पहात बसली. मला हे सर्व पाहून अपार आश्चर्य वाटले, मी तिला विचारले- बाई, तुम्ही कोण? आणि हा मुलगा कोणाचा ?  या मुलाला मारायला सूरी उगारलीत काय आणि ती दूर टाकून त्याला कुरवाळू लागलात काय" 'भावारे, भी एक दुर्दशी बाई आहे. मी आपल्या वडिलांबरोबर एका जत्रेला मे दोते. तेथून मला एका राक्षसाने पळवूनआज आणि येथे आणून टाकले. थोड्या- वेळानें आगली दोन राक्षस आले. तेव्हां मला कळले की इथे तीन राक्षस राहतात. त्यांनी त्यांच्याशी लग्न करून देण्यासाठी मला फार आग्रह केला. पण मी ऐकलें नाही म्हणून ते मला एकाचा मोलकरणी सारखी ठेवून घेत आहेत. त्यांनी या मुलाला सकाळी कोठून तरी धरून आणले आणि मला म्हणाले, " याला शिजवून तयार ठेव. मी ह्यालाचिरून शिजवून ठेवले नाही तर मला मरावेच लागेल आव." तुला भिण्याचे कारण नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मी तिला धीर दिला आणि म्हणालों, वा मुलाला मारूं नकोस. मी या राक्षसांचा अंत करून तुला आणि या मुलाला वाचविन." नंतर मी तिला एका हरणआणून दिले आणेने त्या मुलाऐवजी शिजवून ठेवायला सांगितले. त्या मुलाचेंच मांस शिजवले आहे, ह्यावर विश्वास बसावा म्हणून मी मुलाची करंगळी थोडी कापून कचर्यात टाकायला तिला रागितले. मी सांगितल्या- प्रमाणे तिने सर्व केल्यानंतर तिघे राक्षस आले. तिघांनी मांस मिटक्या मारुन खाल्ले . परंतु त्यांची भूक भागली नाही. एक राक्षस सैंपाक घरांत काही खायला मिळाले तर पहावे म्हणून आला. त्याने मला पाहिले व खांद्यावर टाकून बाहेर निघाला. पण मी मोठ्या शिताफीने त्याय सुरी भोसकून मारले. तो तेथेच गार झाला. तो बराच वेळ बाहेर न आलेला पाहून दुसरा राक्षस सेंपाक घरांत आला. त्याने आपल्या एका मित्राला मरून पडलेले पाहिले व मला धरून खांद्यावर टाकले. मी त्याला सुद्धा सूरी भोसकून ठार केलें, दोघे राक्षस परत न आलेले पाइन तिसरा राक्षस आपली गदा घेऊन सैंपाक घरांत आला. त्याने मला पाहिले. पण मला मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने आपल्या गदेचा प्रहार माझ्यावर केला. पण मी ही दूर पळून गेलो आणि त्यारा बार चुकविला. त्याची गदा जमिनीवर आदळली आणि जमिनीत जाऊन रुतून यली. स्थाने गदा बाहेर काढण्यासाठी दोन्ही हातांचा जोर लावला. मी ती संधी साधून त्याच्या छातीत सुरी भोकसली व त्याचा शेवट करून टाकला. तिए राक्षसांचा अशा प्रकारे शेवट झाला आणि  माझा जीव तर
वचलाच ती आई व मूल पण वाचले. अशी गोष्ट सांगून काळा चोर म्हणाला- 'महाराज आता आपणच सांगा की त्या दिवशी माझा मृत्यू जास्त जवळ येऊन ठेपला होता की आज !" राजा म्हणाला "त्या दिवशीच. 

त्या दिवशी ज्या मुलाला यांचविलेंस तोच मी. ही पहा माझी करंगळी अर्थी कापलेली आहे." इतके सांगून ऋतुपर्ण राजा उठला आणि काळ्या चोराला छातीशी धरून महणाला-"माझ्या हातून केय मोठे पाप घडत होते. मी आपल्या प्रनदात्याचाच वध  करणार होतो. देवाने वांचविल इणूनच हे पाप माझ्या हातून घडले नाही. माझ्या वडिलांनी तुझा शोध काढण्याचा पुष्वळ प्रयत्न केला. सांपडला नाहीस. देव तारी त्याला कोण मारी हेच खरें। 

नाहीतर माझा जीव कसा वाचला असता ? आजपासून हे राज्य तुझे झाले. तू चोरीचा धंदा सोडून दे आणि ह्या राजकुमाराना मी माझे घोडे भेट म्हणून देतो. असे सांगून ऋतुपर्ण राजाने सर्वाना निरोप दिला. 

 तिघे मुलगे ऋतुपर्ण राजाचे घोडे घेऊन आलेले पाहून सावत्र भाईला आश्चर्यच वाटले. तिला प्रथम खरेच वाटलेनाही. परंतु तिने विचार केला, माझ्या मुलाला राज्य मिळाले नाही तरी हरकत नाही, पण त्याला हे सुदर घोडे तर मिळाले. असा विचार करून तिने आपल्या मनाचे समाधान करून घेतले.

 "माई! तुझ्या सांगण्याप्रमाणे घोडेआणून दाखविले आहेत. हे घे घोडे. आता हे राज्यआमचे झालें." असें राजकुमारांनी म्हटल्यावर राणीने राज्य देण्याचे मान्य  केलें. राजकुमारांनी घोड्याचे लगाम काढून घेतल्याबरोबर घोडे पळून गेले. 

"तुम्ही मला घोडे दिले नाहीत. ही फसवणूक चालायची नाही!" राणी ओरडली 'घोडे आणण्याची अट होती. तुला द्यायची अट नव्हती  ते आम्हाला सांगितलेच नव्हते. " राजकुमार म्हणाले. राणी निरुतर झाली. तिच्या दासीने तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.पण समजून काय फायदा ? 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel