प्रिय मैत्रीण
सहसा असं पत्र लिहिलं जातं की, पत्र लिहिण्यास कारण की वगैरे वगैरे पण मला तुला लिहायला कुठलेही कारण नको आहे मुळी...... तुझ नाव येथे लिहिलं असतं मी पण तुही जाणते आहेस की तुझं नाव मला ठाऊक नाही. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर तुलादेखील माझं नाव ठाऊक नव्हतं. कस असणार म्हणा? आपली ओळखच स्वप्नांमधून झाली आहे ना....कितीतरी न संपणाऱ्या गोष्टी आपण एकमेकांना स्वप्नातून बोललो. अर्थात त्यावेळी तुझी ओळख एवढीच होती की, तू एक साउथ इंडियन भागात राहणारी माझी आतुरतेने वाट पाहणारी मुलगी. एक गोष्ट फारच भयानक वाटते कधीकधी ती म्हणजे, ज्या आतुरतेने तू माझी वाट पाहतेस आणि ज्या कुतूहलानं मी तुझी वाट पाहतोय तेवढ्यात संयमान तूदेखील माझी वाट पाहते आहेस. माझा शोध घेत आहेस. पण खरं सांगायचं तर तुझं हे माझ्यासाठी वाट पाहणं माझ्या मनाला फार आनंद देऊन जातं. तुझही मन पत्राद्वारे जाणून घ्यायला मी फार उत्सुक आहे. तेव्हा लिहायला विसरू नकोस तुझ्या पत्राची आवर्जून वाट पाहणारा.....
तुझा मित्र
किरण पवार