प्रिय मैत्रीण

तुझं पत्र मिळालं. फार आनंद झाला हे कळाल्यावर की, तू पुन्हा आनंदी राहायला लागलीस. आणि रहावही प्रत्येक माणसाने आनंदी. हक्कच आहे त्याचा तो. पण आता कुठेतरी आपल्यातली ही मैत्री माझ्या मनात न जाणो का हजारो प्रश्नांच कोड निर्माण करू लागली आहे. त्या हजारो प्रश्नांची उत्तरे शोधताना रात्रीची झोपही नाहीशी झाली माझी.... मी असं अजिबात म्हणत नाहीये की, आपण दोघांनी प्रत्यक्षात इतक्या लवकर भेटलंच पाहिजे. पण मी फक्त माझी मानसिक दुविधा तुझ्या समोर मांडतोय. म्हणतात ना व्यक्त झाल्याने मन हलक होतं; म्हणुनच तुझ्यासमोर वेदना व्यक्त करण्याचा हा अट्टाहास. आणि तसंही माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय इतर कोण आहे जे मला समजून घेणार..?? पण सोड ते.... तुझं विश्व गमतीशीर आहे खूप. हां कारण मी तुझ्या विश्वाला सातत्याने स्वप्नात भेटत आलोय. स्वप्नात तुझ्या अवतीभोवतीचं जग तुला फार त्रास देतयं; हे माझं वाटनही सत्य होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. पण तू हार न मानता खंबीरपणे ऊभी रहा. आधी तुझ्यासोबत कुणी नव्हतं. पण आता मी आहे आणि मी शेवटपर्यंत असेन....

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel