साक्षर झालेल्या समाजाला 
जातीबद्दल बोलावं म्हणलं....

गावा बाहेरील वस्त्यांना 
गावासोबत जोडावं म्हणलं....

कुबट विचारांची होळी रोज
चौका-चौकात पेटवावी म्हणलं....

अस्पृश्यासारखं लढून पुन्हा
चवदार तळं चाखावं म्हणलं....

जाता जाता रस्त्यावरची 
मस्तकी धूळ लावावी म्हणलं....

स्वर्ग नरकासारखेच येथे
पाप-पुण्य शोधावं म्हणलं....

वैष्णवांच्या मेळ्यामधी 
स्वतःला हरवून जावं म्हणलं....

पांडुरंग होऊन कुंडलिकाला
डोळे भरून पाहावं म्हणलं....

पापा सोबत चंद्रभागेत
जात अर्पण करावी म्हणलं....

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel