जन्म झाला म्हणजे 
काळ तोही ठरला आहे,
जाण्याची हुरहूर कशाला 
अजुनी तो दूर आहे....

मी कैकदा जाऊन आलो 
मृत्यूलाही भेटलो आहे,
वणवा पेटावा तसा
तोही पेटलेला आहे...

दिलाही असेल शब्द एखादा 
सहज आपलं चालतांना,
नको आठवू पुन्हा जरा 
मी आता मरणात आहे...

घाबरलो नाही गोष्टी
ऐकून मरणाच्या,त्याला
पाहून अंगणात माझ्या,
आज मी थरथरत आहे...

तू माडी वरून बघ जरा
दारातून जाणार आहे,
परत येणार नाही कधी
हा प्रवास शेवटचा आहे.....

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel