शोनार बाँग्ला

बंगाल…! इस्ट इंडिया कंपनीला सहज पाय रोवता आले असा हा प्रदेश…! भारतातले सर्वात मोठे शहर म्हणजे बंगालची राजधानी कोलकत्ता. स्वातंत्र्यपूर्व काळात “फोडा आणि राज्य करा” या ब्रिटीश राजनीतीला बळी पडलेला प्रदेश म्हणजे बंगालच. रवींद्रनाथ टागोर , राजा राम मोहन रॉय, सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यासारखे महान समाजसुधारक आणि क्रांतिकारक बंगालचेच..! असे असूनही, बंगालच्या लोकशाहीत कम्युनिस्ट आणि स्वतःला डाव्या विचारसरणीचे म्हणवून घेणाऱ्या माओवादी आणि नक्षली विचारसरणीच्या लोकांमुळे नेहमी रक्तरंजित निवडणुका आपण पहिल्या किंवा ऐकल्या, अनुभवल्या आहेत. २०२१ ची करोनाच्या सावटाखालची निवडणूक देखील याला अपवाद ठरली नाही. फासिवादाचा बुरखा पांघरलेली नेतृत्व हि खरोखर लोकशाही पध्दतीने निवडून आली आहेत कि, आणखी कोणत्या मार्गाने…? बंगालबद्दल राजकीय, सामाजिक, भौगोलिकदृष्ट्या नेहमीच भारताला आणि इतर जगाला एक वेगळे आकर्षण राहिले आहे. यासगळ्याची एक झलक या पुस्तकात आहे.

रुद्रमुद्रा रमेश अणेरावजाळून टाकला तरी राखेतून पुन्हा जिवंत होऊन भरारी घेणारा विचार... म्हणजे फिनिक्स या पक्षाप्रमाणे आयुष्य जगायला हवे. कितीही अडथळे आले तरी त्या अडथळ्यांना पार करून एखाद्या नदीप्रमाणे आपल्या मार्गावरून वाहत राहायला हवे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel