अहंकार(निरहंकार)

शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे ! महासागरासारखे !

त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे?

विचारतरंग:
वरील गोष्ट माझ्या वाचनात आली आणि मला त्यावरून अल्बर्ट आइन्स्टाइन यांची अशीच गोष्ट आठवली. एवढी प्रचंड बुद्धिमत्ता व महान शास्त्रज्ञ असूनही  त्यांच्या अंगी नम्रता वाखाण्याजोगी होती .ते एकदा समुद्र किनारी फिरत असताना  त्यांची एकाने अशीच स्तुती केली त्यावर ते म्हणाले ."समुद्र किनारी जेवढी वाळू पसरलेली आहे त्यातील एका कणाएवढेही माझे ज्ञान नाही "ही नम्रता केवळ दाखवण्यापुरती नव्हती तर ती आतूनच आलेली होती .निरनिराळ्या कालखंडातील निरनिराळ्या प्रदेशातील महान लोकांचे अंतरंग व विचार पद्धतीत साम्य आढळून येते.

अशा कथांचे तात्पर्य सांगावयाचे नसते कथा वाचून ते(तात्पर्य ) अंत:करणाला जाऊन भिडले पाहिजे तरच उपयोग .
असे असावे किंवा असे वागावे असे सांगून काही उपयोग होत नसतो .


स्पंज ज्याप्रमाणे पाणी टिपून घेतो त्याप्रमाणे एखादी व्यक्ती जो बोध घ्यावयाचा तो आपोआपच घेते. 
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel