नागाव येथे १८४७ साली श्री आठवले यांच्या हस्ते या या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.

या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीस एकवीस साली झाला ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी पर्यंत नामसप्ताह असतो.

मुरुड, नांदगाव, अलिबाग, आवास, आक्षी, किहीम, रेवस आदी ठिकाणांहून नागाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे.

ही गणेशमुर्ती उजव्या सोंडेची असुन संगमरवरी चौथऱ्यावर बैठक असलेली आहे.

मुंबईवरून रेवससाठी लाँचेस मिळतात तिथून नागावला एसटीने दीड तास लागतो.

हे मंदिर म्हणजे समुद्रतळाशी रमणीय सुरुची आणि नारळाचे बने यांची पार्श्वभूमी लाभलेले ठिकाण आहे.
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel