सातारा शहरातील चिमणपुरा वस्तीत हे गणेशाचे ठिकाण आहे

सुमारे तीनशे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी या गणेश मंदिराची स्थापना झाली होती

पूर्वी सोमवार पेठेतील रखमाईनी तेली यांच्या घरी  असलेली गणेशमूर्ती श्रींच्या दृष्टांतानुसार ब्रह्मवृंदाकडे सुपूर्द करण्यात आली होती.

वैशाख शुद्ध तृतीयेस तिची प्रतिष्ठापना केली गेली छत्रपती शाहू महाराजांचे एक संकट या गणपतीने निवारले असल्याची चर्चा आहे

त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी या मंदिराला अनेक प्रकारे मदत केली होती.

अश्वत्थ वृक्षाखाली हे मंदिर होते १९९२ ला या मंदिराचा जीर्णोद्धार झाला

मूर्ती गारांची आहे त्यामुळे तिला गारेचा गणपती असे नाव पडले ही मूर्ती उजव्या सोंडेची असून रिद्धी सिद्धी सोबतची आहे.

या मंदिरात देवाचा उत्सव अक्षय्य तृतीया केला जातो. माघ द्वितीया ते नवमीपर्यंत हा उत्सव चालतो. मनोकामना पूर्ण करणारे हे श्रद्धास्थान मानले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel