शून्यात मी मजला बघतो
क्षणभर स्वतः हरवून जातो,
न कळता नजरेत
डोह वेदनेचा भरून घेतो....

आयुष्य तरी असतं किती
सुखाचं जगणं सरून जातं,
विहिरीचं काठोकाठ भरलेलं 
पाणी क्षणात आटून जातं....

रोज सूर्य उगवतो
मावळतीला सोडून जातो,
दाटलेल्या अंधारात 
पुन्हा मी हरवून जातो....

स्वप्न बघावी तरी कुठली
आयुष्याला ना छेदली कधी,
जीवनाची दोर ही
कुणी शोधली का कधी.....

जन्मलो म्हणून काय जगायचं
मरतांना माघे काय सोडायचं,
सुख-दुःखाच गणित
आपलं आपणच मांडायचं....

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel