हनुमान त्यांच्या समाजातील सर्वात आदरणीय, महान विद्वान आहे.महान पराक्रमी योद्धा, सेनापती होते. आणि सुग्रीवाच्या राजामंत्र्याची अद्भूत क्षमता सर्वत्र ज्ञात होती. त्याला सगळीकडे आदर होता. प्रत्येक कामात त्याचा सल्ला घेतला जायचा. हिंदी भाषेमध्ये ‘पुछ होना’ याचा अर्थ असा कि ‘एखाद्या माणसाला समाजात मान असणे’ असा असतो. परंतु खरा अर्थ लोक बाजूला ठेवून त्यांच्या स्वतःच्या अज्ञानामुळे चुकीचा अर्थ काढतात.

सीतेला भेटल्यानंतर हनुमान जेव्हा लंकेत पकडले गेले तेव्हा त्याने आपल्या बुद्धिमत्तेने आणि शारीरिक शक्तीने संपूर्ण लंकेत जोरदार खळबळ उडवून दिली होती, ज्यामुळे संपूर्ण लंका जळू लागली होती. ती एक प्रकारची बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे चीनने हल्ला करून संपूर्ण भारताला आग लावली, असे म्हटल्यास सर्वत्र संतापाची लाट उसळली, तर याचा अर्थ लोकांच्या विचारसरणीत तीव्र संताप आणि सूडाची भावना निर्माण झाली आहे. चीनने शब्दश: आग लावून, रॉकेल ओतून आणि संपूर्ण भारतभर भौतिक आग लावून ज्वाळा निर्माण केल्या असा त्याचा अर्थ होणार नाही.

म्हणजेच ज्यांनी हनुमानाला शेपूट असलेला प्राणी म्हटले त्यांनी त्याचा अपमान केला आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel