“तुम्ही मरणार नाही. मरणाचा जप करणारा मरत नसतो. आत्महत्या म्हणजे एक स्फूर्ती आहे. एक जोराची लहर आहे. विचार करून कोणी आत्महत्या करीत नसतो.”

“बरे. जातो.”

“उदयचा कर्मक्षेत्रात उदय होवो.”

उदय गेला. सामान घेऊन गेला. कोठे गेला? त्याने का जीव दिला? का त्यालाही वाटत होते की, सरला भेटेल? सरलेच्या हृदयात कोणी बोले, “रडू नको. धीर धर. तुझा उदय भेटेल.” उदयच्यही हृदयात कोणी बोलत होते का? त्याला कोणी धीर देत होते का? आशेची पाखरे त्याच्याही कोमल हृदयवेलीवर गात होती का? खेळत होती का?

उदय गेला. मधूही बाहेर फिरायला गेला. हा तरुण का खरेच जीव देईल? का स्वत:ची भावनाशक्ती तो समाजसेवेत ओतील, क्रांतीत ओतील? अशा विचारात मधू किती तरी दूर गेला. उदय जीव देणार नाही या आशेने तो खोलीत परत आला. उदय, नाही ना देणार जीव?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel