पाली भाषेतः-

७४५ एतं आदीनवं ञत्वा दुक्खं आरम्भपच्चया।
सब्बारम्भं पटिनिस्सज्ज अनारम्भे विमुत्तिनो।।२२।।

७४६ उच्छिन्नभवतण्हस्स सन्तचित्तस्स भिक्खुनो।
वितिण्णो जातिसंसारो नत्थि तस्स पुनब्भवो ति।।२३।।

सिया अञ्ञेन पि...पे.. कथं च सिया। यं किञ्चि दुक्खं सम्भोति सब्बं आहापरच्चया ति अयं एकानुपस्सना, आहारानं त्वेव असेसविरागनिरोधा नत्थि दुक्खस्स सम्भवो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा...अथापरं एतदवोच सत्था—

७४७ यं किञ्चि दुक्खं सम्भोति सब्बं आहारपच्चया।
आहारानं निरोधेन नत्थि दुक्खस्स सम्भवो।।२४।।

मराठी अनुवादः-

७४५ कर्माच्या धडपडी पासून दु:ख होतें, हा (कर्मांच्या धडपडींतील) दोष जाणून सर्व कर्माची धडपड सोडून ज्या ठिकाणी कर्माची धडपड नाहीं अशा (निर्वाणांत) मुक्ति पावणार्‍या, (२२)

७४६ आणि भवतृष्णेचा उच्छेद करणार्‍या शांतचित्त भिक्षूची जन्मपरंपरा मागें पडली; त्याला पुनर्जन्म राहिला नाहीं.(२३)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व १आहारांपासून, (१ अन्न, स्पर्श, मन:संचेतना व विज्ञान-असे चार प्रकारचे आहार निरनिराळ्या लोकांतील प्राण्यांकरितां सांगितले आहेत.) ही एक अनुपश्यना; आणि आहारांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७४७. जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व आहारांपासून; आहारांच्या निरोधानें दु:खाचा उद्भव होत नाहीं.(२१)

पाली भाषेतः-


७४८ एतं आदीनवं ञत्वा दुक्खं आहारपच्चया।
सब्बाहारं परिञ्ञाय सब्बाहारमनिस्सितो।।२५।।

७४९ आरोग्यं सम्मदञ्ञाय आसवानं परिक्खया।
संखाय सेवी धम्मट्ठो सखं न उपेति वेदगू ति।।२६।।

सिया अञ्ञेन पि...पे.. कथं च सिया। यं किञ्चि दुक्खं सम्भोति सब्बं इञ्जितपच्चया ति अयं एकानुपस्सना, इञ्जितानं त्वेव असेसविरागनिरोधा नत्थि दुक्खस्स सम्भवो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा...अथापरं एतदवोच स्तथा—

७५० यं किञ्चि दुक्खं सम्भोति सब्बं इञ्जितपच्चया।
इञ्जितानं निरोधेन नत्थि दुक्खस्स सम्भवो।।२७।।

मराठी अनुवादः-

७४८ आहारांपासून दु:ख होतें, हा (आहारांतील) दोष जाणून, व सर्व आहार ओळखून, कोणच्याही आहारांवर अवलंबून न राहतां,(२५)

७४९ सम्यकप्रज्ञेनें आरोग्य पाहून आश्रवांचा नाश करून जो विचारपूर्वक आहारांचा उपयोग करतो, तो धर्मस्थित वेदपारग पुन: नामाभिधान (जन्म) पावत नाहीं.(२६)

दुसर्‍याही पर्यायानें....इत्यादी...ती कशी? जें काहीं दु:ख उद्भवतें तें सर्व प्रकंपांपासून, ही एक अनुपश्यना; आणि प्रकंपांचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें...इत्यादि... तो सुगत शास्ता म्हणाला—

७५०. जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व प्रकंपांपासून; प्रकंपांच्या निरोधानें दु:खाचा उद्भव होत नाहीं.(२७)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel