* I wandered lonely as a cloud
That floats on high o'er vales and hills,
When all at once I saw a crowd,
A host of golden daffodils,
Beside the lake, beneath the trees,
Fluttering and dancing in the breeze.
Continuous as the stars that shine
And twinkle on the milky way,
They stretched in never-ending line
Along the margin of a bay :
Ten thousand saw I at a glance
Tossing their heads in sprightly dance.
The waves beside them danced, but they
Out-did the sparkling waves in glee :-
A poet could not but be gay
In such a jocund company !
I gazed-and gazed-but little thought
What wealth the show to me had brought;
For oft, when on my couch I lie
In vacant or in pensive mood,
They flash upon that inward eye
Which is the bliss of solitude;
And then my heart with pleasure fills,
And dancer with the daffodils.
--- Palgraves Golden Treasury, Book IV. p. 86

अनित्यतेवर ध्यान करण्याचा प्रकार सर्वांना सारखाच नवीन वाटण्याचा संभव आहे.  परन्तु याचाही विकास पाश्चात्त्य देशात बॅर्गसोंच्या (Bergson) तत्त्वज्ञानात आणि ईट्स (Yeats) सारख्या कवीच्या काव्यात होत चालला आहे.

In all her foolish things that live a day,
Eternal Beauty wandering on her way.

यात ईट्सने अनित्यतेचे सरस वर्णन केले आहे.  आता तिच्यावर ध्यान करून व अष्टांगिक मार्गाचे रहस्य जाणून आत्मपरहिताला तत्पर होणे, हा केवळ बुद्धाचाच मार्ग आहे.  पण कालांतराने त्याचाही विकास पाश्चात्य देशात होईल अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

सामान्य लोकांना उपयोगी पडण्यासारखे बौद्ध वाङ्‌मय देशी भाषांतून तयार करण्याचा माझा हेतु पुष्कळ दिवसांचा होता; परंतु समाधीचा मार्ग सामान्य लोकांसाठी नाही असे मला वाटत होते.  येथे आल्यावर सत्याग्रहाश्रमवासी एक गृहस्थ सात-आठ महिने एकान्तात राहिले होते, असे माझ्या ऐकण्यात आले.  अर्थात या गृहस्थाला पहाण्याची मला उत्सुकता झाली.  पुढे यांनींच आमच्या विद्यापीठाच्या महामात्राची जागा पुन्हा स्वीकारली, व सुदैवाने त्यांचा परिचय होण्यास विशेष संधी सापडली.  विद्यापीठ सामान्य लोकांसाठी आहे, व त्यात काम करणार्‍या सर्व लोकांनी सामान्य लोक सुसंस्कृत होतील याजकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे, असे ते वारंवार म्हणत असतात.  एकान्ताची आवड आणि सामान्य जनसमूहाच्या उन्नतीसाठी उत्सुकता, या त्यांच्या दोन गुणांमुळे प्रस्तुत पुस्तक लिहिण्यास मला उत्तेजन मिळाले, आणि म्हणूनच ते मी त्यांना अर्पण केले आहे.

सुधारणेच्या नवीन साधनांच्यायोगे जगाची अशांतता कमी न होता वाढली आहे.  सिनेमा, नाटके, यांच्यापासून तहत स्वदेशाभिमानापर्यंत सर्व राष्ट्रांत सारखी धावपळ चालली आहे; जणू काय जगात एक प्रकारचा भयंकर ज्वर उत्पन्न झाला आहे !  अशा प्रसंगी शांत चित्ताने विचार करून आपले आणि जगाचे धोरण ठरवणार्‍या माणसांची वाण भासू लागली आहे, आणि जे कोणी थोडे सत्पुरुष शांत चित्ताने विचार करून जगाचे धोरण ठरवू पहात आहेत, त्यांचा मार्ग जाणण्याचे सामर्थ्य सामान्य लोकांत नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्‍नांचा व्हावा तसा फायदा होत नाही.  अशा वेळी हा समाधीचा- समाधानाचा- प्राचीन मार्ग वाचकांला दाखवून देण्यात येत आहे.  त्याचा ते आत्मपरहितासाठी उत्तम उपयोग करून घेतील, व अशान्त जगात शांतीची स्थापना करतील अशी आशा आहे.

-- लेखक
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel