लोक आपल्याला विनाकारण त्रास देतात व छळतात अशी एक सापाने देवाजवळ तक्रार केली. ती ऐकून देव त्याला म्हणाला, 'अरे, ही तुझीच चूक. ज्याने तुला त्रास दिला त्याला तू कडकडून चावला असतास तर इतर लोक तुझ्या वाटेला गेले नसते.'

तात्पर्य

- आपल्याला त्रास देणार्‍या एका माणसाला क्षमा केली तर दुसरी माणसंही आपल्याला त्रास देतात. यासाठी पहिल्यापासून सावध रहावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel