एक सांबर आजारी पडले असता चरायच्या कुरणात कोपर्‍यात स्वस्थ पडून राहिले. त्या कुरणात चरणारे त्याचे मित्र व इतर प्राणी त्याला भेटायला येत. त्यापैकी प्रत्येक प्राणी त्याच्या पुढे ठेवलेल्या गवतापैकी काही गवत खाऊन जात असत. असे होता होता, ते गरीब बिचारे सांबर मरण पावले. पण ते आजारपणाने मरण न पावता त्याला भेटायला येणार्‍या प्राण्यांनी त्याच्यापुढील सगळे गवत खाऊन टाकल्याने उपासमारीमुळे मेले.

तात्पर्य

- दुष्ट मित्र हितापेक्षा अहितच जास्त करतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel