कोणताहि मार्ग घ्या. लोकांना सुखी करा. जीवनाच्या आवश्यक गरजा सर्वांच्या भागल्या पाहिजेत. अन्नवस्त्र, ज्ञान, विश्रांति, आनंद सर्वांना मिळाली पाहिजेत. आज अशी परिस्थिति आहे की सर्वांना या वस्तू देतां येतील; नीट योजना मात्र हवी. संशोधनाचा मानवी सुखासाठी उपयोग केला म्हणजे हे सारें होईल.

पंडित जवाहरलाल एकदां म्हणाले “कोट्यावधि लोक अन्नवस्त्रास पारखे असतां, ज्ञानानंद व कलानंद यांना पारखे असतां, धर्मांच्या व संस्कृतीच्या गप्पा हे लोक मारतात तरी कसें ? खरें आहे. खरा धर्म अद्याप यावयाचा आहे.

“सर्वेऽत्र सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा काश्चिददु:खमाप्नुयात्” ।।


असें नुसतें पुटपुटून भागणार नाही. हें मनोहर व मंगल दृश्य जगांत प्रत्यक्ष दिसावें म्हणून सर्वस्वार्पण बुद्धिनें झगडायला जो उभा राहिल तो खरा देवाचा लोडका. तो खरा ज्ञानी. तो खरा भक्त.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel