लेखक - संतोष चोरगे

◆ देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये.

◆ स्त्रियांनी केव्हाही तुळस तोडू नये.

◆ देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी काढावी.

◆ शिवपिंडाला अर्धिच प्रदक्षिणा दोन्हीकडून घालावी. म्हणजे एक प्रदिक्षणा पूर्ण होते.

◆ एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळिग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस पुजू नयेत.

◆ गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडी जपू नये.

◆ शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन पुजू नयेत. विषमात एक पुजावयास हरकत नाही.

◆ देवापुढे श्रीफळ (नारळ) वाढवितांना शेंडीचा भाग नेहमी देवाकडे करावा.

◆ निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र घालू नये.

◆ देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नयेत.

◆ संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये.

◆ देवाला अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रोक्षण करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही.

◆ विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये.

◆ शिव मंदिरात झांज, सुर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी वाजू नये.

◆ द्वादशीस कधीही तुळस तोडू नये. तसेच रविवारी, दुर्वा तोडू नयेत.

◆ आपली जपमाळ व आसन कधीही दुसऱ्यास वापरण्यास देवू नये.

◆ देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे.

◆ देवाला धूप दाखविताना धुपाचा धुर हाताने न पसरविता पंख्याने पसरावा.

◆ समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती असाव्यात, सम असू नयेत.

◆ अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये.

◆ उंबऱ्यावर बसून शिंकू नये.

◆ निजलेल्या माणसास कधीही ओलांडून जावू नये.

◆ दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

◆ रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद आणू नयेत किंवा दुसऱ्यास देवू नयेत.

◆ सायंकाळी केर काढू नये व घरची दारे बंद ठेवू नयेत. कारण त्यावेळी लक्ष्मी घरात येते अशी समजूत आहे.

◆ रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा.

◆ कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे म्हणून निरोप घ्यावा.

◆ एका हाताने देवाला नमस्कार करू नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel