तीन वर्षाच्या कालावधीनंतर त्यांनी शेहनशाह चित्रपटाद्वारे पुन्हा त्यांनी आगमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला. त्यानंतर येणाऱ्या चित्रपटांमध्ये त्यांची स्टार पावर कमी होत गेली. त्यानंतरच्या येणाऱ्या सर्व फिल्म अपयशी ठरल्या. १९९१ मध्ये आलेली हिट फिल्म (हम) मुळे असं वाटलं कि आता परिस्थिती बदलेलं पण तसं काहीही झालं नाही. इतकं झाल्यानंतरही १९९० मधल्या अग्निपथ चित्रपटात त्यांना राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. अस वाटत होतं कि त्यांना आता काही काळच रुपेरी पडद्यावर बघायला मिळेल. १९९२ ला खुदागवाहच्या रिलीज नंतर पुढील पाच वर्ष रिटायरमेंट घेतली. १९९४मध्ये त्यांच्या उशिरा रिलीज होणाऱ्या चित्रपटानंमधला इनसानियात रिलीज झाला पण तोही अपयशी ठरली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel