महात्मा गांधीनी दिलेल्या "गुरुदेव" या टोपण नावावरूनच ही गोष्ट लक्षात येते की ते किती महान आणि उत्कृष्ट शिक्षक होते. त्यांचे सर्वांत मोठे योगदान - शांतीनिकेतन इथे विश्व भारतीसारखी - इंदिरा गांधी, सत्यजित रे, अमर्त्य सेन, गायत्री देवी, अब्दुल गनी यांसारख्या दिग्गजांची शिक्षण संस्था बनली.
एक शिक्षक, या रुपात ते आपल्या काळाच्या फार पुढचा विचार करत असत. घरातच आपले शिक्षण घेतलेल्या टागोरांनी कराचे शिक्षण घेण्याच्या पद्धतींचे समर्थन केले. त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतींमध्ये प्रवास (यात्रा), चर्चा, वादविवाद आणि अनुमान यांसारख्या पद्धती समाविष्ट होत्या. ते विशेषकरून लहान मुलांच्या शिक्षणावर लक्ष देत असत. त्यांच्या मते एका लहान मुलाची कल्पनाशक्ती खूप विस्तृत आणि अचूक असते आणि त्यांना सर्वसामान्य शिक्षणाच्या नियमांमध्ये अडकवून ठेवल्यास त्यांची वाढ थांबून जाईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel