हनुमान ब्रम्हचारी होते. तरीही ते एका पुत्राचे पिता बनले होते. अर्थात हा पुत्र वीर्यापासून नव्हे तर घामाच्या थेम्बापासून जन्माला आला होता. कथा काहीशी अशी आहे. जेव्हा हनुमान सीतेचा शोध घेत लंकेला पोचले तेव्हा मेघनादाने त्यांना पकडून रावणाच्या दरबारात सादर केले. तेव्हा रावणाने त्यांच्या शेपटीला आग लावली होती आणि हनुमानाने त्या शेपटीने संपूर्ण लंका जाळली होती. शेपटी पेटलेली असल्यामुळे हनुमंताला तीव्र वेदना होत होत्या, ज्या शांत करण्यासाठी शेपटी विझवायला ते समुद्राच्या पाण्यात गेले. त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब त्या पाण्यात पडला जो एका माशाने प्रश्न केला होता. त्याच घामाच्या थेंबापासून मासा गर्भवती राहिला आणि त्याच्यापासून एक पुत्र उत्पन्न झाला. त्याचे नाव पडले मकरध्वज. मकरध्वज हा हनुमानाप्रमाणेच महापराक्रमी आणि तेजस्वी होता. अहिरावणाने त्याला पाताळ लोकात द्वारपाल म्हणून नियुक्त केले. जेव्हा अहिरावण राम आणि लक्ष्मण यांना देवीला बळी देण्यासाठी आपल्या मयाबलावर पाताळात घेऊन आला होता, तेव्हा राम - लक्ष्मणाला मुक्त करण्यासाठी हनुमान पाताळात गेले होते. तिथे त्यांची गाठ मकरध्वज याच्याशी पडली. तेव्हा मकरध्वजाने आपल्या उत्पत्तीची कथा हनुमानाला सांगितली. हनुमंतांनी अहिरावणाचा वध करून श्रीराम आणि लक्ष्मण यांना मुक्त केले आणि मकरध्वजाला पाताळ लोकाचा स्वामी म्हणून नियुक्त केले आणि त्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel