सहस्त्रबाहू अर्जुनाला एक हजार हात होते, म्हणूनच त्याला सहस्त्रबाहू हे नाव पडले. जेव्हा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी युद्ध करायला गेला तेव्हा सहस्त्रबाहू अर्जुनाने आपल्या हजार हातांनी नर्मदेचा प्रवाह रोखला होता. त्याने नर्मदेचे पाणी एकत्र करून एकदम सोडून दिले, ज्यामुळे रावण आपल्या संपूर्ण सैन्यासह वाहून गेला. या पराभवानंतर पुन्हा एकदा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाशी युद्ध करण्यासाठी गेला, त्यावेळी तर सहस्त्रबाहू अर्जुनाने त्याला बंदी बनवून तुरुंगात डांबले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel