प्राचीन काळी सत्य विक्रम नावाचा एक राजा होऊन गेला. शत्रूंनी त्याचे राज्य हिरावून घेतले, ज्यामुळे तो वनात भ्रमण करू लागला. एकदा त्याला फिरताना वसिष्ठ मुनींचा आश्रम दिसला. मुनींनी विचारल्यावर राजाने त्यांना आपली संपूर्ण कहाणी सांगितली. वसिष्ठ मुनींनी त्याला सांगितले की तू अवंतिका नगरीतील महाकाल वनाच्या जवळ जा, तिथे तुला एक तपस्वी भेटेल. वसिष्ठ मुनींच्या आज्ञेने राजा महाकाल वनात आला आणि त्याने तपस्वीचे दर्शन घेतले. तपस्वीने आपल्या हुंकाराने त्याला स्वर्गातील अप्सरा आणि जल पऱ्यांचे दर्शन घडवले.
राजाने त्यांना विचारले की हे सर्व काय होते तेव्हा त्यांनी सांगितले की आता तू शत्रूंच्या नाशासाठी महादेवाचे पूजन कर. शिवलिंगाचे केवळ दर्शन घेतल्यावर राजाच्या सर्व शत्रूंचा मृत्यू झाला आणि राजाने निष्कंटक पृथ्वीवर राज्य केले आणि अंती तो मोक्षपदाला गेला.
असे मानले जाते की कंटेश्वर महादेवाचे दर्शन पूजन केल्याने मनुष्याचे सर्व कंटक नाश पावतात आणि तो शंकराच्या सान्निध्यात जातो. काहींच्या मते हे शिवलिंग निलकंठेश्वर या नावाने देखील ओळखले जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel