खूप काळापूर्वी देवता आणि दानव यांच्यात युद्ध झाले. दैत्यांचा स्वामी जम्भ आणि इंद्र यांच्यात अनेक वर्षे युद्ध चालले. ज्यामध्ये दैत्य विजयी झाले आणि अंधकासुर याने स्वर्गावर राज्य करायला सुरुवात केली. एक दिवस अंधकासुर याचा एक दूत कैलास पर्वतावर गेला आणि भगवान शंकरांना म्हणाला की अंधकासुरने सांगितले आहे की तुम्ही कैलास सोडा आणि पार्वतीला माझ्याकडे पाठवा. यावर शंकराने दुताला सांगितले की अंधकासुरला सांग इथे येऊन युद्ध कर आणि मला पराभूत करून पार्वतीला घेऊन जा. हे ऐकून अंधकासुर युद्ध करायला कैलासावर आला.
शंकराने त्रिशूळ प्रहार करून अंधकासुरला जखमी केले आणि पाताळापर्यंत फिरवून आणले. अंधकासुरच्या रक्तापासून त्याच्यासारखे अनेक दानव उत्पन्न होऊ लागले. तेव्हा शंकराने आपल्या शक्तीपासून महादुर्गेला प्रकट केले आणि दुर्गाने अंधकासुरचा वध केला. शेवटी अंधकासुरने भगवान शंकराची उपासना केली. शंकराने त्याला महाकाल वनात पृथुकेश्वर महादेवाच्या पूर्वेला असलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. शूळाने मृत्यू झाला म्हणून हे शिवलिंग शूलेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य शूलेश्वर महादेवाचे दर्शन पूजन करतो तो सर्व प्रकारचे भय आणि दुःख यांपासून मुक्त होतो आणि अंती मोक्षपदाला जातो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel