वतस्ता नदीच्या किनारी पांडव नावाचा एक ब्राम्हण राहत असे. जातभाई आणि त्याच्या पत्नीने त्याचा त्याग केला होता. ब्राम्हणाच्या जवळ प्रेमधारिणी कथा राहत होती. पांडवाने एका गुहेत पुत्र प्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन त्याला पुत्र प्रदान केला. ब्राम्हणाने ऋषींच्या उपस्थितीत पुत्राची मुंज केली आणि त्याला दीर्घायुषी होण्याचा आशीर्वाद द्या अशी विनंती ऋषींना केली.`ऋषी तिथून आशीर्वाद न देता निघून गेले. यावर ब्राम्हण रडू लागला आणि म्हणाला की शंकराने मला पुत्र प्रदान केला आहे तो अल्पायुषी कसा असू शकेल?
वडिलांचे दुःख पाहून बालक हर्षवर्धन ने संकल्प केला की तो महेश्वर भगवान रुद्र याचे पूजन करेल आणि त्यांच्याकडून चिरायू होण्याचे वरदान प्राप्त करून यमराजावर विजय मिळवेल. हर्षवर्धन ने महाकाल वनात जाऊन शंकराचे पूजन केले आणि त्यांना प्रसन्न करून चिरायू होण्याचे आणि अंती शिवालोकात जाण्याचे वरदान प्राप्त केले. कालांतराने हे शिवलिंग कंथडेश्वर महादेव या नावाने प्रसिद्ध झाले.
असे मानले जाते की जो कोणी मनुष्य या शिवलिंगाचे दर्शन पूजन करतो तो चिरायू होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel