महारथी म्हणून गाजलेला कर्ण ही व्यक्तिरेखा अनेक लेखकांची आवडती आहे. मराठीत त्याचेवर विपुल लेखन झाले आहे. कर्ण हा प्रत्यक्षात कुंतीपुत्र असूनहि त्याला राधेय, सूतपुत्र म्हणून सर्व जन्म घालवावा लागला हा त्याचेवर फार मोठा अन्याय झाला या दृष्टिकोनातून या बहुतेक लेखनामध्ये एक सहानुभूतीचा सूर सर्वत्र ऐकू येतो. जातिभेद, अनौरस संतति, या विषयांवर आजच्या काळातील विचारांच्या पार्श्वभूमीवर योग्यच असले तरी ज्या काळातील ही कथा आहे त्या वेळच्या समाजधारणांशी हे फारसे सुसंगत नाही. महाभारतकथेमध्ये कर्ण हे एक महत्वाचे पात्र आहे. काही प्रसंगात त्याची प्रमुख भूमिकाहि आहे. महाभारतातील या प्रसंगांतील कर्णाच्या चित्रणाचा विचार करून खुद्द महाभारतकारांना कर्ण कसा दिसत होता, इतर समकालीनांना कसा वाटत होता हे पाहाणे उद्बोधक होईल. यासाठी कर्णजन्माच्या कथेपासून सुरवात करून पूर्ण मागोवा घेण्याचा विचार आहे. अद्भुतता बाजूला ठेवून, ही सर्व माणसांची कथा आहे या भूमिकेतून मी माझे विचार मांडणार आहे. पांडवांचे काय किंवा कर्णाचा काय, जन्म देवांपासून झाले ही कल्पना वा श्रद्धा दूर सारून, विचार करावयाचा व काही ठिकाणी तर्क चालवावयाचा आहे. पुढील लेखापासून माझ्या प्रतिपादनाला सुरवात होईल. आपण वाचत रहालच असे वाटते. धन्यवाद.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel