ब्रिहीदारिथ मगधचे राजा होते पण त्यांना पुत्रप्राप्ती झाली नव्हती. त्यांनी चंद्रकौशिका नावाच्या एका संतांची सेवा केली ज्यांनी त्याला पुत्रप्राप्तीसाठी एक फळ दिलं. ब्रिहीदारिथाने त्याचे दोन भाग करून आपल्या दोन्ही पत्नींना दिले. दुर्दैवाने दोन वेगवेगळ्या भागांचा जन्म झाला. राजाने घाबरून त्या दो न्ही भागांना जंगलात सोडलं. जरा नावाच्या एका राक्षसीने त्या दोन्ही भागांना हातात घेतलं तर त्याचं एक नवजात बालक तयार झालं. राक्षसीने त्या बालकाला राजाकडे सोपवलं.  त्या बालकाचं नाव जरासंध ठेवण्यात आलं आणि तो मगधचा एक शक्तिशाली राजा झाला. त्याने त्याच्या दोन्ही मुलींची लग्न कंस राजाशी लावली पण कृष्णाने त्याचा वध केला.  आपल्या मुलींचं दुःख पाहून जरासंधाने १७ वेळा मथुरेवर हल्ला चढवला. त्यामुळे कृष्णाला आपली राजधानी बदलून द्वारका करावी लागली. कृष्णाने भीमाला युक्ती सुचवली की त्याच्या शरीराचे दोन भाग करून ते वेगवेगळ्या दिशांना फेकावे. अशा प्रकारे जरासंधाचा भीमाच्या हस्ते वध झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel