७३

महात्माजींनी प्रयत्नपूर्वक स्वत:च्या जीवनातून भीती घालविली होती. लहानपणी अंधारातून जायला भिणारा हा मोहनदास पुढे मूर्तिमंत निर्भयता झाला. एकदा साबरमतीच्या आश्रमात बसले असता त्यांच्या मांडीवर साप पडला. गांधीजी त्याच्याकडे बघत होते. तो का बापूजींच्या मांडीवर क्षणभर लोळायला आला होता? प्रेमामृताची गोडी चाखायला आला होता? ज्याला सर्व विश्वात परमेश्वर दिसतो, त्याला कोणापासून कशाचे भय?

एकदा एकाने गांधीजींना प्रश्न केला, ‘गांधीजीं, समोरून वाघ आला तर काय कराल?’

‘मी नि:शंकपणे त्याच्या अंगावरून निघून जाईन. माझ्या बाबतीत काय करायचं ते वाघानं ठरवावं.’ बापू म्हणाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel