समसुखांवाचुन द्वैतबुद्धीला हरीची समाधी साधत नाही.

समाधी हरीची सम सुखेविण । न साहेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

दुजेपणाचा आभाव हेंच बुद्धीचे वैभव

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एक्या केशवराज सकळसिद्धी ॥२॥

परमानंदांत मन नसेल तर रिद्धि सिद्धि ही अवघी उपाधिच होय.

रिद्धि सिद्धिनिधी अवघोच उपाधि । जंव त्या परमानंदी मन नाही. ॥३॥

सर्वकाळ हरीच चिंतन हेंच समाधान

ज्ञानदेव रम्य रमलें समाधान । हरीच चिंतन सर्वकाळ ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel