कालिदासाने उल्लेख केलेले शूरसेन चा अधिपती सुषेण याचे नाव काल्पनिक वाटते. पौराणिक सूची, शिलालेख इत्यादींमध्ये मथुरेच्या कोणत्याही सुषेण नावाच्या राजाचा उल्लेख मिळत नाही. कालिदासाने त्याला 'नीप-वंशाचा' म्हटले आहे. परंतु ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. नीप दक्षिण पांचाल च्या एका राजाचे नाव होते, जो मथुरेचा यादव राजा भीम सात्वत चा समकालीन होता. अनेक वंशज निपवंशी म्हटले गेले. कालिदासाने वृंदावन आणि गोवर्धनाचे देखील वर्णन केले आहे. वृन्दावानाच्या वर्णनावरून एक गोष्ट लक्षात येते की कालिदासाच्या काळात या वनाचे सौंदर्य अतिशय प्रसिद्ध होते आणि इथे अनेक प्रकारच्या फुलांचे वृक्ष आणि वेली नांदत होत्या. कालिदासाने वृन्दावानाला कुबेराच्या चैत्ररथ नावाच्या उद्यानाची उपमा दिली आहे. गोवार्धानाच्या शोभेच्ध्ये वर्णन करताना महाकवी म्हणतो, ' हे इंदुमती, तू गोवर्धन पर्वताच्या त्या कड्यांवर बैस जे पावसाच्या पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्यातून शिलाजित सारखी सुगंधी निघत राहते. तू गोवार्धानाच्या रमणीय परिसरात वर्ष ऋतूत मयूर नृत्य पहा.' कालिदासाची ही वर्णने पाहून तत्कालीन शूरसेन जनपदाच्या महत्वपूर्ण स्थितीचा अंदाज लावता येऊ शकतो. आर्यावर्ताच्या प्रसिद्ध राजांसोबत त्याने शूरसेन अधिपतीचा उल्लेख केला आहे. 'सुषेण' हे नाव काल्पनिक असून देखील असे म्हणता येईल की शूरसेन वंशाची गौरवपूर्ण परंपरा इ. स. पाचव्या शतकापर्यंत अबाधित होती. वृंदावन, गोवर्धन आणि यमुनेच्या वर्णनावरून ब्रज च्या तत्कालीन सुषमेचा अंदाज करता येऊ शकतो.

कालिदासाचे नाटक `मालविकाग्निमित्र' मुले माहिती पडते की सिंधू नदीच्या तटावर अग्निमित्राचा पुत्र वसुमित्र याची लढाई यवनांशी झाली आणि भीषण युद्धानंतर यवनांचा पराभव झाला. यवनांचा नेता त्या आक्रमणात कदाचित मिनेंडर होता. प्राचीन बौद्ध साहित्यात या राजाचे नाव 'मिलिंद' असे आढळते.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel