1 November 1948 - 26 November 1948
आता भारतीय सेना सर्व आघाड्यांवर पाकिस्तानी सेना आणि तीची मदत होत असलेली आझाद काश्मीर सेना यांच्यावर भारी पडू लागली होती. पुंछला एका वर्षाच्या मोठ्या वेढ्यातून मुक्त करण्यात आले होते आणि गिलगित स्काउट जी आतापर्यंत चांगले यश मिळवत होती, तिला अखेर पराभूत करून भारतीय सेनेने कारगिल स्वतंत्र केले. परंतु पुढे हल्ला करण्यासाठी भारतीय सेनेला रसद अपुरी पडण्याची अडचण येऊ शकत होती. त्यामुळे त्यांना थांबावे लागले. जोजिला दर्र्याला रणगाड्यांच्या मदतीने (यापूर्वी संपूर्ण जगात कधीही एवढ्या उंचीवर रणगाड्यांचा वापर्र करण्यात आला नव्हता) ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने त्या ठिकाणी रणगाड्यांची अपेक्षा कधीही केली नव्हती. त्यामुळे त्यांचा लगेचच पराभव झाला. रणगाड्यांचा वापर बर्मा युद्धातून मिळालेल्या अनुभवामुळेच शक्य झाला होता. जोजिला ताब्यात आल्यानंतर द्रास वर सहज कब्जा करता आला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel