http://bharatdiscovery.org/bharatkosh/w/images/thumb/b/b0/Manmohan-Singh.jpg/200px-Manmohan-Singh.jpg

मनमोहन सिंग भारताचे १४ वे पंतप्रधान होते. सोबतच ते एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. २००९ लोकसभा निवडणूक विजयानंतर ते जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे असे पहिले पंतप्रधान होते, ज्यांनी आपला ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर सलग दुसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. त्यांना २१ जून १९९१ ते १६ मे १९९६ पर्यंत नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री या नात्याने केलेल्या आर्थिक सुधारणांचे श्रेय दिले जाते. त्यांनी आपल्या आर्थिक उदारीकरणाला उपचाराचे स्थान देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला विश्वाच्या बाजाराशी जोडले. त्यांनी आयात आणि निर्यात देखील सोपी बनवली. लायसेन्स आणि परमिट जुन्या गोष्टी झाल्या. खाजगी गुंतवणूकीना प्रोत्साहन करून आजारी आणि नुकसानीत चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांच्या साठी वेगळ्या नीती विकसित केल्या. नवीन अर्थव्यवस्था जेव्हा डबघाईला आली होती तेव्हा नरसिंह राव यांना टीकेला सामोरे जावे लागले. विरोधी पक्ष त्यांना नवीन आर्थिक धोरणांपासून सावध करत होता. परंतु नरसिंह रावांनी मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. केवळ दोन वर्षांत टीकाकारांची तोंडे बंद झाली आणि डोळे विस्फारले. उदारीकरणाचे उत्कृष्ट परिणाम भरतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागले होते आणि अशा प्रकारे एक व्यक्ती जी राजकारणात नव्हती आणि एक अर्थशास्त्राची प्राध्यापक होती, तिचा राजकारणात प्रवेश झाला जेणे करून बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel