१८६९ साली जन्मलेले
स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते ,
' महात्मा गांधी ' म्हणून ओळखले
जे आज भारतभर जाते.
रवींद्रनाथ टागोर यांनी ज्यांना
दिली ' महात्मा ' ही उपाधी,
असे आपले महान
मोहनदास करमचंद गांधी.
सुभाषचंद्र बोस यांनी ज्यांना
' राष्ट्रपिता ' म्हणून संबोधले,
इंग्रजांविरुद्ध त्यांनीच
'भारत छोडो आंदोलन ' केले.
सत्य, अहिंसा व असहकार
ही त्यांची तत्त्व होते,
ते करमचंद व पुतळीबाई गांधी
यांचे चौथे अपत्य होते.
तेराव्या वर्षी त्यांचे कस्तुरबा
यांच्याशी लग्न झाले,
इंग्रजाविरुद्ध त्यांनीच
भारतात सत्याग्रह केले.
हरीलाल, मणिलाल, रामदास व
देवदास ही त्यांची अपत्ये,
'करो या मरो', 'सत्य ही ईश्वर'
ही त्यांचीच वाक्ये.
वयाच्या २२व्या वर्षी
ते बॅरिस्टर झाले ,
इंग्रजाविरुद्ध चळवळी व
आंदोलन करुन यश मिळवले.
वकील,राजकीय नीतिशास्त्रज्ञ ते
तेच वसाहतवाद विरोधी ,
असे आपले ' बापू '
बॅरिस्टर महात्मा गांधी .
श्रध्दा शिवाजी बरदाडे