मी कल्पेश शिंदे

मी आज तुम्हाला माझ्या मित्रा सोबत झालेला 7 वर्षा पुर्विचा किस्सा शेअर करतोय ,

मी आणि माझा मित्र आकाश असेच एक दिवशी नुकतेच रात्र शाळेत गेलो होतो ; तशी ती शाळा फार जुनी होती . रात्री ठिक 8 : 00 ला आमचा पहिला इतिहासाचा तास सुरु झाला होता . त्या विषयाचे शिक्षक वर्गात आले , आम्ही दोघे जण नेहेमी प्रमाणे शेवटच्या बेंच वर बसलो , आणि अमचे लक्ष त्या विषया पासुन फार चलबिचल झाले कारण आम्ही दोघे सलग कधी सवय नसतानाही शाळे मागच्या विहरीत पोहायला गेलो होतो ; त्यामुळे आम्हाला आंगात ताप भरला होता . एन 10 विच्या वेळेस जर सुट्टी घेतली तर फेल होण्याचे चांस असायचे कारण तो आमच्या शाळेचा रुलच होता . वर्गात लक्ष नसल्याने आम्ही दोघे तसेच झोपी गेलो होतो . अशी सलग 2 तास होऊन गेली तरी आम्ही झोपेत च होतो ; शनिवार व आमावस्या असल्याने 10 : 30 शाळा सुटली आणि आम्ही झोपेतुन उठलो 11 : 15 ला रात्र तर भयान होती आम्ही कसेबसे उठलो व घरी जायला निघालो , शाळा घरा पासुन 3 कि.मी च्या आंतरावर होती . शाळा आणि घर यांच्या वाटेत 1. 5 कि.मी वर एक भयानक वाडा होता ; मला आणि माझ्या मित्राला तो वाडा नेहमी शाळेकडुन घराकडे जाताना व येताना लागत आसे , तो वाडा जुनाट आसल्याने तिथुन दिवसा ढवळ्या येताना काही नाही वाटत पण रात्री फार भीती वाटत आसे , गावकर्यांची आशी बोली असायची की तिथे एक म्हतारी रहायची , तिला रोज मटन व मांस खायची सवय होती . एके दिवशी तिच्या मुलाने कंटाळुन तिच्या मटनात विष कालुन ते मटन तिला खायला दिले व ती मरण पावली तिचा घडलेला हा प्रकार गावकर्यानी पाहिला व ती जाता - जाता तिच्या मुलाला नाही तर आख्या गावाला शाप दिला " तुम्ही सर्व याच वाटेवरून जाताना , ठिक आहे ,

आता या वाटे वरुन जो कोणी रात्री 11 नंतर फिरेल त्याला मी माझे भक्ष बनवेल " आसा वाईट शाप देउन त्या म्हतारीने प्राण सोडले ,

गावकर्यानी घडलेला प्रकार लक्षात घेताच त्या म्हतारी विषयी बोलायला लागली की येडी होती आणि काय पण बरळत , शाप देउन गेली ; येडपट कुठची , आसे म्हणत गावकर्यानी तो विषय लक्षात घेतला नाही . पण काहीच दिवसांत त्या म्हतारीच्या दृष्ट आत्म्याने आपला ईंगा दाखवयला सुरवात केली , ती दर आमवस्येच्या दिवशी येणार्या - जाणार्या ला आपल्या शिकारीत पकडायची , आश्या हा प्रकार गावकर्यानच्या लक्षात आल्याने गावकरी घाबरत त्या वाटे वरुन ये - जा करायची .

आम्ही सहज त्या वाटे वरुन जाताना मी आकाशला विचारले की ' आकाश किती वाजले आहेत . ' त्या प्रमाणे आकाश उत्तरला ' 11 : 07 ' हे एकताच आमची टर्र फाटली आम्ही दोघे धावत - धावत जात होतो आणि तो वाडा जवळ आला , आमच्या रुधयाची धडकन तेज वाढत चालली होती . आणि शेवटी तो प्रकार घडला जो नव्हता घडायला पाहिजे , त्या दृष्ट आत्म्याने आम्हाला आडवले व मोठ मोठ्याने आमच्याकडे बघुन हसायला लागली , आम्ही तिच्या कडे न पाहताच पळत सुटलो आणि पळत सुटता - सुटता ती आचानक आमच्या समोर आली आणि आम्हाला म्हटली " आता तुम्ही दोघे माझे भक्ष बनलात , मी तुम्हाला खाणार " एवढ्यात मी लगेच माझ्या दप्तरातील आंगारा घेतला व त्या आत्म्यावर भिरकावला व तिला त्यच्या मोठा झटका बसला ति एकदम लांब फेकली गेली आणि आम्ही मोका भेटताच पळत सुटलो आणि हानुमान चालिसा मंत्राचे पठण करत आम्ही दोघे त्या एरिआ पासुन फार लांब आलो . आणि काही वेळातच आम्ही आमच्या घरी पोहचलो आणि जेवण करुन झोपी गेलो , हा सर्व घडले ला प्रकार आम्ही आई - वडिलांना सांगितला व त्यानी त्यावर उत्तरले की त्या आत्म्याची दृष्ट शक्ती

फक्त आमावस्या लाच आसते ; ईतर दिवशी ती कधीच कोणाला त्रास देत नाही .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel